शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

वीज भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:48 AM

वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली.

ठळक मुद्दे्रपरतूर : तालुक्यातील भारनियमन बंद करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली.या मोर्चाचे नेतृत्व सभापती कपिल आकात यांनी केले. यावेळी तालूकाध्यक्ष रमेश सोळंके, कुणाल आकात,जि. प. सदस्य शिवाजीराव सवने, माजी सरपंच ज्ञानेश्वर बिडवे, नगरसेवक अकिल काजी, विजय राखे, महेश नळगे, जमिल कुरेशी, सरंपच शत्रुग्न कणसे, समता परीषदेचे मधूकर झरेकर हे होते. याप्रंसगी तालुकाध्यक्ष रमेश सोळंके म्हणाले की, या शासनाने दिलेली अश्वासने पाळली नाही, आज सर्व शेतकरी अडचणीत आहेत. भारनियमन रद्द करून कोणतीही वसूली करू नये अशी मागणी यावेळी सोळंके यांनी केली. यावेळी प्रभाकर धुमाळ, एम. डी . सवणे, डॉ. प्रदिप चव्हाण, मा. सरपंच मुळे सह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थीत होते.तालुक्यात आधीच पावसाने दडी दिली आहे. वीज नसल्याने शेतकºयांना कपाशी. तुरीच्या पिकाला पाणी देता येत नसल्याची खंत मोर्चेकºयांनी व्यक्त केली. यामुळे तालुक्यातील भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यात आली.आश्वासनाची पूर्तता होईना : आकातमोर्चाला संबोधीत करतांना सभापती कपिल आकात म्हणाले की, या शासनाने राज्य भारनियमन मुक्त करुन असे निवडणुकीच्या वेळी अश्वासन दिले होेते. मात्र अद्यापही आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने जनतेची निराशा झाली आहे. शेतकºयांना व सर्व सामान्य जनतेस खोटी अश्वासने देवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर हे सरकार आश्वासने विसरले आहे. आज सर्वत्र दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. शेतकºयांना वीज नाही. थोडेबहूत पाणी शेतकºयाकडे आहे, मात्र वीजेअभावी ते सुध्दा पिकांना देता नाही. यामुळे शेतकरी हैराण आहे.यामुळे शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली असल्याचे कपिल आकात म्हणाले.भारनियमन बंद करण्याची मागणीजाफराबाद : तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थीती असतांना आणि पारंपारिक नवरात्र, दसरा व दिवाळी सणांच्या तोंडावरच महावितरण कंपनीने भारनियमन सुरु करुन भक्तांच्या श्रध्देला भारनियमनचा शॉक दिला आहे. वीज नसल्याने शेतकºयांना पिकाला पाणी देता येत नसल्याची खंत मोर्चेकºयांनी व्यक्त केली. भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने महावितरणने उपकार्यकरी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राजेश म्हस्के, गजानन ऊबाळे, दत्तु अंभोरे, नितीन शिवणकर, गजानन शेवत्रे गोपाल लोखंडे, पांडु लोखंडे, राहुल वाकडे, संतोष अंभोरे, संदिप पंडित, शेख मोईज, मिर्झा जाहेदबिन, सदानंद सगट, पाडुरंग लोखंडे, गणेश लोखंडे, बाळु पंडीत, सतीष ताकपीरे, देविदास खरात आदीच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :JalanaजालनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMorchaमोर्चाmahavitaranमहावितरण