शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वीज भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:49 IST

वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली.

ठळक मुद्दे्रपरतूर : तालुक्यातील भारनियमन बंद करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली.या मोर्चाचे नेतृत्व सभापती कपिल आकात यांनी केले. यावेळी तालूकाध्यक्ष रमेश सोळंके, कुणाल आकात,जि. प. सदस्य शिवाजीराव सवने, माजी सरपंच ज्ञानेश्वर बिडवे, नगरसेवक अकिल काजी, विजय राखे, महेश नळगे, जमिल कुरेशी, सरंपच शत्रुग्न कणसे, समता परीषदेचे मधूकर झरेकर हे होते. याप्रंसगी तालुकाध्यक्ष रमेश सोळंके म्हणाले की, या शासनाने दिलेली अश्वासने पाळली नाही, आज सर्व शेतकरी अडचणीत आहेत. भारनियमन रद्द करून कोणतीही वसूली करू नये अशी मागणी यावेळी सोळंके यांनी केली. यावेळी प्रभाकर धुमाळ, एम. डी . सवणे, डॉ. प्रदिप चव्हाण, मा. सरपंच मुळे सह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थीत होते.तालुक्यात आधीच पावसाने दडी दिली आहे. वीज नसल्याने शेतकºयांना कपाशी. तुरीच्या पिकाला पाणी देता येत नसल्याची खंत मोर्चेकºयांनी व्यक्त केली. यामुळे तालुक्यातील भारनियमन बंद करण्याची मागणी करण्यात आली.आश्वासनाची पूर्तता होईना : आकातमोर्चाला संबोधीत करतांना सभापती कपिल आकात म्हणाले की, या शासनाने राज्य भारनियमन मुक्त करुन असे निवडणुकीच्या वेळी अश्वासन दिले होेते. मात्र अद्यापही आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने जनतेची निराशा झाली आहे. शेतकºयांना व सर्व सामान्य जनतेस खोटी अश्वासने देवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर हे सरकार आश्वासने विसरले आहे. आज सर्वत्र दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली आहे. शेतकºयांना वीज नाही. थोडेबहूत पाणी शेतकºयाकडे आहे, मात्र वीजेअभावी ते सुध्दा पिकांना देता नाही. यामुळे शेतकरी हैराण आहे.यामुळे शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली असल्याचे कपिल आकात म्हणाले.भारनियमन बंद करण्याची मागणीजाफराबाद : तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थीती असतांना आणि पारंपारिक नवरात्र, दसरा व दिवाळी सणांच्या तोंडावरच महावितरण कंपनीने भारनियमन सुरु करुन भक्तांच्या श्रध्देला भारनियमनचा शॉक दिला आहे. वीज नसल्याने शेतकºयांना पिकाला पाणी देता येत नसल्याची खंत मोर्चेकºयांनी व्यक्त केली. भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने महावितरणने उपकार्यकरी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राजेश म्हस्के, गजानन ऊबाळे, दत्तु अंभोरे, नितीन शिवणकर, गजानन शेवत्रे गोपाल लोखंडे, पांडु लोखंडे, राहुल वाकडे, संतोष अंभोरे, संदिप पंडित, शेख मोईज, मिर्झा जाहेदबिन, सदानंद सगट, पाडुरंग लोखंडे, गणेश लोखंडे, बाळु पंडीत, सतीष ताकपीरे, देविदास खरात आदीच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :JalanaजालनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMorchaमोर्चाmahavitaranमहावितरण