शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

विल्हेवाट लावा नाही तर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:07 AM

उत्पादक कंपन्यांनी पाणी पाकिटांची योग्य विल्हेवाट लावावी. अन्यथा प्लॅस्टिक कॅरीबॅग वापर व विक्री अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बुधवारी आठ कंपन्यांना बजावल्या आहेत.

जालना : पाणीपाऊच व प्लॅस्टिक कॅरीबॅगमुळे शहरातील नाल्यांचा श्वास कोंडला आहे. नाल्यांची पाणी रस्त्यावर येत असून, सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्यांनी पाणी पाकिटांची योग्य विल्हेवाट लावावी. अन्यथा प्लॅस्टिक कॅरीबॅग वापर व विक्री अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बुधवारी आठ कंपन्यांना बजावल्या आहेत.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. इतर जिल्ह्यात कुठेही न दिसणारी पाणीपाऊच संस्कृती जालन्यात पाहावयास मिळते. कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर काहीही न विचारता पाणीपाऊच समोर ठेवले जाते. लग्न, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, मोर्चे, मिरवणुका यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपाऊच वाटप केले जाते. त्यामुळे पूर्वी केवळ जारच्या माध्यमातून पाणीविक्री करणा-या कंपन्यांनी आता पाणीपाऊच विक्रीवर भर देण्यास सुुरुवात केली आहे. उत्पादक, वितरक, ग्राहक अशी एक साखळीच पाणीपाऊच संस्कृतीमुळे तयार झाली आहे. यामुळे शहराचे स्वरुप मात्र बदलले आहे. हॉटेलबाहेरील परिसरात, शहरातील रस्त्यांसह नाल्यांमध्ये सर्वत्र पाऊच दिसत आहेत. शहरात निघणा-या एकूण कच-यापैकी सर्वाधिक कचरा प्लॅस्टिक कॅरीबॅग व पाणीपाऊचचा आहे. शहरात प्लॅस्टिक कच-याने गंभीर स्वरुप घेतले आहे. याला प्रतिबंध घालण्याचे मोठे आव्हान नगरपालिका प्रशासनासमोर आहे. त्यामुळे नगरपालिकेने महाराष्ट्र प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादन, विक्री, वापर व विल्हेवाट अधिनियमाच्या उल्लंघन प्रकरणी ५० हजारांचा दंड लावून गुन्हे दाखल करण्यात का येऊ नये, असे खांडेकर यांनी सांगितले. तशी नोटीसही उत्पादकांना देण्यात आली आहे. तीन दिवसांत खुलासा सादर करून, पाणीपाऊचची विल्हेवाट लावावी, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नोटिसीत नमूद आहे.-----------पाणी पाऊचची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी उत्पादक कंपन्यांचीच आहे, हे कंपनीच्या संचालकांना बैठकीत सांगण्यात आले. उत्पादकांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या पुढे पाणीपाऊचची विल्हेवाट न लावणाºया उत्पादक व विके्रत्यांवर कारवाई करण्यात येईल.संतोष खांडेकर, मुख्याधिकारी न.प. जालना