शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

पालिकेचे आरक्षित भूखंड उद्देशाविना पडून : नागरिक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST

आज हे आरक्षण निश्चित करून सात वर्षे लोटली आहेत. परंतु एकाही भूखंडावर आरक्षणाचा उद्देश प्रत्यक्षात उतरलेला दिसत नसल्याने अडचण ...

आज हे आरक्षण निश्चित करून सात वर्षे लोटली आहेत. परंतु एकाही भूखंडावर आरक्षणाचा उद्देश प्रत्यक्षात उतरलेला दिसत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. आज अनेकांना कोरोनामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने शेती, प्लॅाट विक्री करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. परंतु पालिकेचे आरक्षण त्यावर असल्याने ते विक्री करताना नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. परंतु हे प्रमाणपत्र दिले जात नसल्याचे दिसून आले. यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

चौकट

सुनावणी होऊनही आरक्षण कायम

शहरातील ज्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकले होते. त्यांची सरासरी एकरात विचार केल्यास दाेन ते पाच एकरपर्यंत जाते. आज ही सर्व आरक्षणे शहरालगत असून, शहरालगतच्या जमिनीचे भाव हे गगनाला भिडले आहेत. सरासरी शहराजवळून जाणाऱ्या बायपासवर एक कोटी रूपये प्रतिएकर असे दर सध्या सुरू आहेत. आमच्या भूखंडावरील आरक्षण हटवावे म्हणून पालिकेने सुनावणी घेतली होती. परंतु काही मोजक्याच नागरिकांची आरक्षणे ही राजकीय दबावानंतर हटवण्यात आली होती. परंतु सर्वसामान्य माणसांचे आरक्षण आजही कायम असल्याने अडचणी येत आहेत.

चौकट

आता केवळ तीन वर्षे उरली

जालना शहराच्या आसपासच्या भूखंडावर आरक्षण टाकण्यात आले होते. परंतु ज्या उद्देशासाठी हे आरक्षण निश्चित केले होते. तो पालिकेने दहा वर्षात साध्य करावा. म्हणजेच समजा क्रीडांगणासाठी आरक्षण असेल तर तेथे क्रीडांगणाचे काम सुरू होणे अपेक्षित असते. परंतु ते देखील सुरू झालेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे हे भूखंड विकसित करण्यासाठी जो मावेजा भूखंड मालकाला द्यावा लागतो तो पालिकेला देणे शक्य होत नसल्याने उद्देश साध्य होत नसल्याचे दिसून आले.