शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

दुरूस्तीअभावी स्मारकांना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:23 IST

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांच्या अवस्थेचा आजच्या निमित्ताने आढावा घेतला आहे. त्यात काही ठिकाणी कामे झाली असल्याचे दिसून आले तर बहुतांश ठिकाणी निधी मिळूनही तो खर्च झाला नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांच्या अवस्थेचा आजच्या निमित्ताने आढावा घेतला आहे. त्यात काही ठिकाणी कामे झाली असल्याचे दिसून आले तर बहुतांश ठिकाणी निधी मिळूनही तो खर्च झाला नसल्याचे चित्र आहे. मराठवाड्याला निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती पुढच्या पिढीला कळाव्यात यासाठी सरकारने त्या थोर स्वातंत्रसैनिकांची स्मारकरूपी आठवण उभी केली आहे. मात्र, आजही जालना शहरातील हुतात्मा जनार्दनमामा यांच्या स्मारकाची दयनीय अवस्था झाली असून, जालना शहरातील या महत्वाच्या स्मारकाकडे प्रशासनास लक्ष देण्यास वेळ नसल्याचे वास्तव समोर आले आहे.जालना जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्रमात हौतात्म्य पत्कारलेल्या पाच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके उभारली आहेत. त्यात जालना, जाफराबाद तालुक्यातील वरूड, जालना तालुक्यातीलच मानेगाव-गणेश, कोलते पिंपळगाव येथे ही स्मारके आहेत. या स्मारकांच्या देखभाल दुरूस्तीसाठी राज्य सरकारने २०१७ मध्ये ५४ लाख ३८ हजार आणि २०१८ मध्ये ३५ लाख ७८ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे.हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेकडे वर्ग केला आहे. असे असताना वरूड येथील अपवाद वगळता अन्य स्मारकांमध्ये या निधीतून काहीच करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान प्रत्यक्षात स्मारकांकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. हा निधी खर्च करण्यासाठी बांधकाम विभागाने कागदोपत्र नियोजन केल्याचा दिखावा केला आहे.याचे ज्वलत उदाहरण म्हणून जालन्यातील हुतात्मा जनार्धन मामा यांचे मोतीबागेजवळ मोठे स्मारक उभारलेले आहे. पूर्वी या स्मारकात जालना पालिकेने पुढकार घेऊन वाचनालय सुरू केले होते. मात्र नंतर ते वाचनालय बंद झाले असून, हे स्मारक म्हणजेच गुरे चरण्याचा अड्डा बनला आहे.राज्य शासनाने स्मारकांचे महत्व लक्षात घेऊन जवळपास दोनवर्षात १ कोटी ११ लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला वर्ग केला होता. जिल्हाधिका-यांनी देखील लगेचच त्या संदर्भातील बांधकाम विभागाला हा निधी देऊन आराखडे तयार करून स्मारकांचे सुशोभीकरण करावे असे निर्देश दिले होते. मात्र या निर्देशांचे पालन होताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाhistoryइतिहास