शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेत मोदी, फडणवीस लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:27 IST

एकूणच जनमताने एकवटून या सरकारला हद्दपार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : आगामी निवडणुकीत मतदारांनी थापा मारणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला हिसका दाखवण्याची गरज असून, दुष्काळातही हे सरकार दुजाभाव करत असल्याने शेतकयांची होरपळ सुरू आहे. त्यामुळे एकूणच  जनमताने एकवटून या सरकारला हद्दपार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. ते घनसावंगी येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार यात्रेत बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात अच्छे दिनच्या नावाखाली महागाई वाढत गेली. २०१४ मध्ये ५५ रूपये लिटर असलेले पेट्रोल आज ८० रूपयांवर पोहोचले आहे. पंतप्रधान स्वत:ला चौकीदार म्हणवतात. असे असताना मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, नीरव मोदी हे देश सोडून जातात कसे, असा सवाल त्यांनी केला. सोलापूर येथे पंतप्रधान मोदी आले असताना भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख हे व्यासपीठावर होते. ते त्यांना कसे चालतात, असा प्रश्नही मुंडेंनी उपस्थित केला. आगामी निवडणुकीत शेतकरी आणि जनता मोदींना घरचा रस्ता दाखवतील, असेही ते म्हणाले.खा. रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना त्यांनी शेतक-यांबद्दल दानवेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. दरम्यान शिवसेनेची आता शेळी झाल्याचेही मुंडे यांनी सांगितले. सध्या संपूर्ण देशात चौकीदार चोर है च्या मुद्यावरून रान पेटल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे ते म्हणाले. त्यावेळी महागाईच्या मुद्यावरून आकांडतांडव करणारा भाजप आता गप्प असल्याने लोकांचे त्यांच्या या बदलत्या विचाराकडे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले. मुंडेच्या चौफेर टोलेबाजीचे सभेस उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण