शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेत मोदी, फडणवीस लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:27 IST

एकूणच जनमताने एकवटून या सरकारला हद्दपार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : आगामी निवडणुकीत मतदारांनी थापा मारणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला हिसका दाखवण्याची गरज असून, दुष्काळातही हे सरकार दुजाभाव करत असल्याने शेतकयांची होरपळ सुरू आहे. त्यामुळे एकूणच  जनमताने एकवटून या सरकारला हद्दपार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. ते घनसावंगी येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार यात्रेत बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात अच्छे दिनच्या नावाखाली महागाई वाढत गेली. २०१४ मध्ये ५५ रूपये लिटर असलेले पेट्रोल आज ८० रूपयांवर पोहोचले आहे. पंतप्रधान स्वत:ला चौकीदार म्हणवतात. असे असताना मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, नीरव मोदी हे देश सोडून जातात कसे, असा सवाल त्यांनी केला. सोलापूर येथे पंतप्रधान मोदी आले असताना भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख हे व्यासपीठावर होते. ते त्यांना कसे चालतात, असा प्रश्नही मुंडेंनी उपस्थित केला. आगामी निवडणुकीत शेतकरी आणि जनता मोदींना घरचा रस्ता दाखवतील, असेही ते म्हणाले.खा. रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना त्यांनी शेतक-यांबद्दल दानवेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. दरम्यान शिवसेनेची आता शेळी झाल्याचेही मुंडे यांनी सांगितले. सध्या संपूर्ण देशात चौकीदार चोर है च्या मुद्यावरून रान पेटल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे ते म्हणाले. त्यावेळी महागाईच्या मुद्यावरून आकांडतांडव करणारा भाजप आता गप्प असल्याने लोकांचे त्यांच्या या बदलत्या विचाराकडे बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले. मुंडेच्या चौफेर टोलेबाजीचे सभेस उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण