शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

महोत्सवातून एकतेचा संदेश- कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:28 AM

राजकारण बाजूला ठेवून जालना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला जालना महोत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे केले. जालना महोत्सवात सोमवारी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजकारण बाजूला ठेवून जालना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला जालना महोत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे केले.येथील कलश सीड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत सुरू असलेल्या जालना महोत्सवात सोमवारी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी आ. राजेश टोपे हे अध्यक्षस्थानी होते.प्रारंभी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग, आ. प्रशांत बंब, सिने अभिनेता सयाजी शिंदे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, ओमप्रकाश मंत्री, महिकोचे चेअरमन राजेंद्र बारवाले, उद्योजक संजय मुथा, उपाध्यक्ष राजेश राऊत,दीपक भुरेवाल आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी रामदास कदम म्हणाले की, जनतेच्या विकासासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र बघण्याचा प्रसंग आपणास जालना शहरात या जालना महोत्सवात बघायला मिळत आहे. जालना शहराची संस्कृती देशभराने स्वीकारावी अशी आहे. जालनेकर राजकारण बाजूला ठेवून सांस्कृतिक कार्यक्रम घेतात, हे चित्र आनंददायी आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून एकतेचा संदेश दिला जातो. आपण देखील कोकणामध्ये असाच महोत्सव सुरू करणार असल्याचे कदम म्हणाले.सिने अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले की, राजकारण बाजूला सारून सर्व नेत्यांनी तसेच जनतेने पर्यावरणावर भर दिला पाहिजे. झाडे जगवून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. देश पुढे गेला तरच शेतकरी प्रगती करेल, असे ही ते म्हणाले. यावेळी रमेशचंद्र बंग म्हणाले की, आपल्या मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून विकासात्मक कार्य केले जात आहे. सर्व सामान्य व्यक्तींचा विकास हाच दृष्टीकोन समोर ठेवून फाऊंडेशन कार्य करीत आहे, असे ते म्हणाले. यावेळी अंकुश देशमुख व राजेंद्र तापडिया यांचा गौरव करण्यात आला तसेच मंगलगाणी-दंगलगाणी या कार्यक्रमाचे निर्माते अशोक हांडे यांचाही गौरव करण्यात आला. प्रारंभी जालना महोत्सवाचे स्वागताध्यक्ष बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच जालना महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष घनश्याम गोयल, सुदेश करवा, ब्रिजमोहन लड्डा, उमेश पंचारिया, सुनील राठी, विजय जैन आदींच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन जोशी यांनी केले तर मनिष तवरावाला यांनी आभार मानले. यावेळी गौतम मुनोत, सुनील दायमा आदींची उपस्थिती होती. यानंतर अशोक हांडे निर्मित मंगलगाणी-दंगलगाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकRamdas Kadamरामदास कदम