शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

जालना जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली; टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 1:02 AM

नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने बदनापूर तालुका सोडता, इतरही तालुक्यातील टँकर बंद केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ््याचे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, भोकरदन तालुका सोडता इतर तालुक्यांमध्ये अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे भरपावसाळ््यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने बदनापूर तालुका सोडता, इतरही तालुक्यातील टँकर बंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गत काही वर्षांपासून मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. गतवर्षीही जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके करपून गेली होती. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबरोबरच जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत होते. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत असल्याने टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत होती. यावर्षी टँकरने ६०० चा पल्ला गाठला होता. यावरुनच गतवर्षीच्या पाणीटंचाईची भीषणता दिसून येते.त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतकºयांना होती. पावसाळ््याच्या सुरुवातीलच पावसाने हजेरीही लावली. शेतकºयांनी याच पावसाच्या भरोशावर लागवड केली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले होते. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील काही भागात याच काळात दमदार पाऊस झाला. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, नदी, नाल्या, तलावांमध्ये पाणीच आले नाही. विहिरी बोअर कोरडेठाक असल्यामुळे भरपावसाळ््यात टँकरची संख्या ४०० जवळपास होती. परंतु, काही दिवसापूर्वीच जिल्ह्यात काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. परिणामी, टँकरची संख्या झपाट्याने कमी झाली. सध्या बदनापूर तालुक्यात ३८ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तर परतूर तालुक्यातील एका गावाला एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.टँकर बंद झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टँकर पुन्हा सुरु करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.संताप : ३९ विहिरींचे अधिग्रहण; वाढीव उपाययोजनांची गरजबदनापूर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींमधून टँकरद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ