शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली; टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 01:02 IST

नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने बदनापूर तालुका सोडता, इतरही तालुक्यातील टँकर बंद केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळ््याचे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, भोकरदन तालुका सोडता इतर तालुक्यांमध्ये अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे भरपावसाळ््यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने बदनापूर तालुका सोडता, इतरही तालुक्यातील टँकर बंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गत काही वर्षांपासून मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. गतवर्षीही जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके करपून गेली होती. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबरोबरच जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत होते. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत असल्याने टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत होती. यावर्षी टँकरने ६०० चा पल्ला गाठला होता. यावरुनच गतवर्षीच्या पाणीटंचाईची भीषणता दिसून येते.त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतकºयांना होती. पावसाळ््याच्या सुरुवातीलच पावसाने हजेरीही लावली. शेतकºयांनी याच पावसाच्या भरोशावर लागवड केली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले होते. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील काही भागात याच काळात दमदार पाऊस झाला. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, नदी, नाल्या, तलावांमध्ये पाणीच आले नाही. विहिरी बोअर कोरडेठाक असल्यामुळे भरपावसाळ््यात टँकरची संख्या ४०० जवळपास होती. परंतु, काही दिवसापूर्वीच जिल्ह्यात काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. परिणामी, टँकरची संख्या झपाट्याने कमी झाली. सध्या बदनापूर तालुक्यात ३८ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तर परतूर तालुक्यातील एका गावाला एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.टँकर बंद झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टँकर पुन्हा सुरु करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.संताप : ३९ विहिरींचे अधिग्रहण; वाढीव उपाययोजनांची गरजबदनापूर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींमधून टँकरद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ