शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

हरवलेला संवाद अन् ताणतणावामुळे अनेकांना मानसिक आजाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 01:14 IST

विविध कारणांनी मानसिक आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्पर्धेच्या युगात सोयी-सुविधा वाढत असल्या तरी कौटुंबिक, सामाजिक संवाद कमी होऊ लागला आहे. परिणामी विविध कारणांनी मानसिक आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हा रूग्णालयात गत सहा महिन्यात विविध मानसिक आजारांनी त्रस्त झालेल्या पाच हजारावर रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.स्पर्धेच्या युगात मानवाचे जीवनमान पूर्णत: बदलून गेले आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत काम आणि सोशल मीडियाच्या जगात वावरणाऱ्या अनेकांना विविध मानसिक आजारांनी ग्रासले आहे. दैनंदिन ताणतणाव, शेतीतील उत्पन्न घटने, कर्जाचा बोजा वाढणे, उत्पन्नाची इतर साधने नसणे, दीर्घकालीन आजार, सतत होणारे कौटुंबिक वाद यासह इतर अनेक कारणांनी विविध मानसिक आजार जडणा-या रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहेत. मानसिक आजारांनी ग्रासलेले रूग्ण अनेक वेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. त्यामुळे अशा रूग्णांवर वेळेत आणि नियमित औषधोपचार घेण्याची गरज आहे.जिल्हा रूग्णालयातील मानसोपचार विभागातील अंतररूग्ण व बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. एप्रिल ते सप्टेंबर अखेरपर्यंत पाच हजारावर रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात बाह्यरूग्ण विभागात नियमित येणारे ७९३ तर नवीन २८७ रूग्ण उपचार घेत आहेत. अंतररूग्ण विभागात ३९२८ रूग्ण नियमित उपचार घेत आहेत. मानसिक आजार किती प्रमाणात आहे, त्यानुसार रूग्णावर दोन वर्षे ते पाच वर्षापर्यंत उपचार केले जातात. अनेक आजारात आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात.मानसिक आजाराची लक्षणेअवास्तव भीती वाटणे, चिडखोरपणा वाढणे, झोपेची गरज कमी होणे, विनाकारण धोका पत्करणे, सतत चिंताग्रस्त राहणे, उदासिन राहणे, उन्मादपणा वाढणे, व्यसनाधीनता वाढणे ही मानसिक आजाराची लक्षणे आहेत. तसेच लहान मुलांमध्ये मतिमंदपणा, झोपेत दचकून उठणे, अडखळत बोलणे, बालगुन्हेगारी, रात्री झोपेत चालणे आदी.असे राहील मानसिक आरोग्य उत्तमसंतुलित व योग्य आहार घ्यावा, नियमित व्यायाम, योगा करावा, पुरेशी झोप घ्यावी, कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवावा, आशावादी-सकारात्मक विचार करावेत, सामाजिक संबंध ठेवावेत, भावनिक नियंत्रण मिळवावे, अति संवेदनशीलता टाळावी, स्वत:च्या मूल्यांचा शोध घ्यावा तसेच निर्व्यसनी राहिले तर मानवाचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यmental hospitalमनोरूग्णालयHealthआरोग्य