शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे अंतरवालीत पोहचले; मराठा समाज बांधवांना महत्त्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 09:29 IST

जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

जालना - मराठा आरक्षणासाठी बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे रविवारी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझा बळी घ्यायचा आहे, त्यासाठी मी सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत ते अंतरवालीतून मुंबईकडे निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांना चक्कर आल्यानंतर त्यांनी रात्रीचा मुक्काम भांबेरी गावात केला. त्यानंतर, आज सकाळी ते पुन्हा मुंबईकडे निघाले होते. अखेर, समर्थकांच्या, पोलिसांच्या आवाहनानंतर भांबेरी गावातून जरांगे परत फिरले असून अंतरवाली सराटीत पोहोचले आहेत. पुढील काही तासांतच ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.  

जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मला सलाईनमधून विष देऊन ठार मारण्याचं कारस्थान होतं, असा गभीर आरोप जरांगे यांनी केला होता. त्यानंतर, ते अंतरवालीतून मुंबईतील सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र, रात्रीच त्यांना चक्कर आल्यामुळे त्यांचा भांबेरी येथे मुक्का झाला. आज सकाळी जरांगे यांनी माध्यमांंशी संवाद साधला. ''उपमुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्वांनी शांत राहावे पोलिसांना त्रास देऊ नये. अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू,'' अशी भूमिका घेत जरांगे पाटील पुन्हा अंतरवालीत पोहोचले आहेत. यावेळी, आज पुन्हा एकदा जरांगे यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, मराठा समाज बांधवांना शांत राहण्याचं आणि घरी जाण्याचं आवाहनही केलं आहे. राज्यभरातील मराठा बांधवांनी शांत राहाव, अंतरावालीत बैठक घेऊन आपण पुढील दिशा ठरवू, असेही त्यांनी म्हटले. मुंबईकडे जाण्याच्या निर्णयावरही ते पुढील काही तासांत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. 

जरांगे पाटील यांनी सोमवारी सकाळी भांबेरी येथे माध्यमांची संवाद साधला. सरकारने सांगितल्याशिवाय जिल्हाधिकारी संचार मधील लागू करू शकत नाहीत. आम्ही मुंबईकडे येऊ नये म्हणून संचार बंदी लावली आहे. रात्री मोठया प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु, आपण  रात्रीच त्यांचा असलेला वेगळा प्लॅन उधळून लावला आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेत आंदोलन करावे, पोलिसांना त्रास देऊ नाये, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही, असे म्हणत जरांगे यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. आज मी जिंकलो, फडणवीस हरले. सगसोयरेसह आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीसांना सुट्टी नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.  

आरोप बिनबुडाचे - फडणवीस

मनोज जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट बोलत आहेत. त्यांच्या विधानांमागील षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश होईल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्र परिषदेत केला. कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. तसेच, माझ्यावर त्यांच्याकडून करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत, हे त्यांनाही माहिती आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा