शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मनोज जरांगे अंतरवालीत पोहचले; मराठा समाज बांधवांना महत्त्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 09:29 IST

जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

जालना - मराठा आरक्षणासाठी बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे रविवारी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझा बळी घ्यायचा आहे, त्यासाठी मी सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत ते अंतरवालीतून मुंबईकडे निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांना चक्कर आल्यानंतर त्यांनी रात्रीचा मुक्काम भांबेरी गावात केला. त्यानंतर, आज सकाळी ते पुन्हा मुंबईकडे निघाले होते. अखेर, समर्थकांच्या, पोलिसांच्या आवाहनानंतर भांबेरी गावातून जरांगे परत फिरले असून अंतरवाली सराटीत पोहोचले आहेत. पुढील काही तासांतच ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.  

जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मला सलाईनमधून विष देऊन ठार मारण्याचं कारस्थान होतं, असा गभीर आरोप जरांगे यांनी केला होता. त्यानंतर, ते अंतरवालीतून मुंबईतील सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र, रात्रीच त्यांना चक्कर आल्यामुळे त्यांचा भांबेरी येथे मुक्का झाला. आज सकाळी जरांगे यांनी माध्यमांंशी संवाद साधला. ''उपमुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्वांनी शांत राहावे पोलिसांना त्रास देऊ नये. अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू,'' अशी भूमिका घेत जरांगे पाटील पुन्हा अंतरवालीत पोहोचले आहेत. यावेळी, आज पुन्हा एकदा जरांगे यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, मराठा समाज बांधवांना शांत राहण्याचं आणि घरी जाण्याचं आवाहनही केलं आहे. राज्यभरातील मराठा बांधवांनी शांत राहाव, अंतरावालीत बैठक घेऊन आपण पुढील दिशा ठरवू, असेही त्यांनी म्हटले. मुंबईकडे जाण्याच्या निर्णयावरही ते पुढील काही तासांत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. 

जरांगे पाटील यांनी सोमवारी सकाळी भांबेरी येथे माध्यमांची संवाद साधला. सरकारने सांगितल्याशिवाय जिल्हाधिकारी संचार मधील लागू करू शकत नाहीत. आम्ही मुंबईकडे येऊ नये म्हणून संचार बंदी लावली आहे. रात्री मोठया प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु, आपण  रात्रीच त्यांचा असलेला वेगळा प्लॅन उधळून लावला आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेत आंदोलन करावे, पोलिसांना त्रास देऊ नाये, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही, असे म्हणत जरांगे यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. आज मी जिंकलो, फडणवीस हरले. सगसोयरेसह आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीसांना सुट्टी नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.  

आरोप बिनबुडाचे - फडणवीस

मनोज जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांची स्क्रिप्ट बोलत आहेत. त्यांच्या विधानांमागील षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश होईल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्र परिषदेत केला. कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. तसेच, माझ्यावर त्यांच्याकडून करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत, हे त्यांनाही माहिती आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा