शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाळू माफियांवर मोठी कारवाई; महसूल पथकावर दगडफेक करणाऱ्या ६० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 18:41 IST

महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत वाहनावर वाळू माफियांनी केली दगडफेक

भोकरदन ( जालना ) : अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांना पकडण्यास गेलेल्या तहसीलच्या पथकावर दगडफेक करणाऱ्या वालसा खालसा येथील 60 जणांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियात खळबळ उडाली आहे. 

तालुक्यातील वालसा-खालसा येथील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात येत असल्याची तक्रार 11 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान  काही नागरिकांनी तहसीलदार सारिका कदम यांच्याकडे केली होती. यावरून कदम यांनी तलाठी बी एम सोनवणे,  तलाठी शाहूंराज कदम, गणेश वाघमारे यांना वालसा खालसा येथे जाण्यास सांगितले. मात्र, पथक जाईपर्यंत नदी पात्रातील टॅक्टर व वाहने पळून गेली.  पथक पोहचले असता वालसा खालसा येथे मंदिराजवळ जमलेल्या नागरिकांनी वाळू माफिया गेल्यास तुम्ही आल्याचे सांगितले. यावरून पथकातील कर्मचारी व या नागरिकांत वाद झाला. 

वाद चिघळत गेल्यानंतर अचानक माफिया व नागरिकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना वाहनातून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेश वाघमारे यांनी गाडीचे दरवाजे लावले. त्यांनी तेथून गाडी काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी अंधारातून काही जणांनी गाडीवर ( एम एच 21 बी 1277 ) दगडफेक केली. दगडफेकीत गाडीचे नुकसान होऊन कोतवाल गणेश वाघमारे जखमी झाले. यानंतर तहसीलदार सारिका कदम व पथकातील तलाठी शाहूंराज कदम यांनी आज सकाळी भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास सपोनि रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कचरू दाभाडे हे तपास करीत आहेत.

गय केली जाणार नाही

काही वाळू माफियांनी वाहने पकडता येऊ नये म्हणून पथकाच्या वाहनावर दगडफेक केली. पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार सहन केला जाणार नसून कोणाची ही गय केली जाणार नाही.- सारिका कदम, तहसीलदार 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना