शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

महात्मा जोतिबा फुलेंनी जात, धर्म बदलण्याचे काम केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:20 IST

महात्मा जोतिबा फुले यांनी जातिव्यवस्था उखडून टाकली. या देशात शेतीचे अर्थशास्त्र त्यांनी मांडले. तसेच जात, धर्म, विवाहसंस्था बदलण्याचं काम करून त्यांनी देशात मोठा बदल घडवून आणला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समीक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : महात्मा जोतिबा फुले यांनी जातिव्यवस्था उखडून टाकली. या देशात शेतीचे अर्थशास्त्र त्यांनी मांडले. तसेच जात, धर्म, विवाहसंस्था बदलण्याचं काम करून त्यांनी देशात मोठा बदल घडवून आणला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समीक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.महात्मा फुले प्रतिष्ठान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले विचार, समाजसुधारणा व प्रासंगिकता याविषयावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, कुटुंबासह सामाजिक प्रश्न मांडत असतांना तुमचं शोषण कसं चालू आहे हे जोतिबांनी दाखवून दिलं. स्त्री-पुरुष दोघांना समान मानणाऱ्या फुलेंनी वयाच्या विसाव्या वर्षी दलित, अस्पृश्य स्त्रियांसाठी शाळा काढली. वाचनालय सुरु केली. तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहही सुरु केले.सावित्रीबाई फुले यांनी समाज बदलण्याचे काम केले. त्यांनी दुष्काळात हजारों भाकरी थापून गोरगरीबांना जेऊ घातले. दुष्काळाच्या काळात सावित्रीबाईंनी पुण्याच्या कमिशनरची भेट घेऊन जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाºयाचा प्रश्न सोडविला, असल्याचेही त्यांनी सांगितले.ही परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजक डॉ. स्मिता अवचार, संयोजन समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी यांनी परीश्रम घेतले. याप्रसंगी डॉ. बंडू कावळे, डॉ. पुरुषोत्तम मनगटे, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. गांधी बानायत यासह परिषदेत महाराष्ट्रातील विविध अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. सूत्रसंचालन डॉ. आसाराम बेवले यांनी तर डॉ. गोवर्धन मुळक यांनी आभार मानले.

टॅग्स :SocialसामाजिकSC STअनुसूचित जाती जमातीEducationशिक्षण