शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

Maharashtra Election 2019 : वॉटर ग्रीडमुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 4:14 PM

मराठवाड्याने राज्याला तीन मुख्यमंत्री दिले मात्र, मराठवाड्याचा अपेक्षित विकास झाला नाही.

ठळक मुद्देबंजारा समाजाचे प्रश्न सोडविणारकाँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला

जालना : मराठवाडा विकासासाठी मंजूर झालेला निधी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन सरकारमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लाटला. त्यामुळे मराठवाड्याचा विकास आवश्यक त्या प्रमाणात झाला नाही. केंद्र आणि राज्य शासनाने वेगवेगळ्या योजना राबवून दुष्काळ मुक्तीला महत्त्व दिले आहे. वॉटर ग्रीड योजनेमुळे आगामी काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊन सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी कलम ३७०, तिहेरी तलाक, बालाकोट एअरस्ट्राईक आदी मुदद्यांवरून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ परतूर येथे बुधवारी दुपारी आयोजित सभेत मोदी बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. बबनराव लोणीकर, आ. अर्जुन खोतकर, हिकमत उढाण, खा. संजय जाधव, आ. मोहन फड, मेघना बोर्डीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. बबनराव लोणीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून केलेल्या विकास कामांची माहिती दिली.

मराठवाड्याने राज्याला तीन मुख्यमंत्री दिले मात्र, मराठवाड्याचा अपेक्षित विकास झाला नाही. मागील पाच वर्षाच्या कालावधीत सरकारने विविध योजना राबवून मराठवाड्याचा विकास केला आहे. जलयुक्त शिवार ही योजना क्रांतीकारक ठरली आहे. कर्जमाफी, भारनियमनमुक्त गावांसाठी प्रयत्न झाले. जालना येथील ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडस्पार्क, औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहत झोन, कौशल्य विकास योजना याबाबींमुळे मराठवाड्याचा विकास होणार आहे. दुष्काळ मुक्तीसाठी वॉटर ग्रीड महत्त्वकांक्षी योजना लाभदायक ठरणार आहे. आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना दुष्काळ जवळून पाहिला आहे. दुष्काळामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊन नागरिकांचे स्थलांतर होते. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाने जलसंवर्धनाला महत्त्व दिले असून, त्यासाठी साडेतीन लाख कोटी रूपये निधीची तरतूद केली आहे. शासनाने अल्पसंख्यांक पेन्शन योजना, आयुषमान भारत, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, शेतकरी पेन्शन, घरकूल आदी अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढविताना तिहेरी तलाक, कलम ३७०, बालाकोट आदी मुदद्यांवर त्यांनी विरोध केला. त्यांची देशभक्ती केवळ त्यांच्या परिवार भक्तीत होती. आता मात्र ते पक्षीय कार्यक्रमात कार्यकर्त्यांना राष्ट्रवादाचे धडे देऊ लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीचे सरकार येणार असल्याचे संकेत दिले होते. विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे उमेदवार विजयी होणार आहेत. विकास कामे होण्यासाठी केंद्र आणि राज्यात एका विचाराचे सरकार हावे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

बंजारा समाजाचे प्रश्न सोडविणारपरतूर विधानसभा मतदार संघात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. याची दखल घेत नरेंद्र मोदी यांनी बंजारा समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत समाजाला आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीpartur-acपरतूरJalanaजालना