शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Maharashtra Election 2019 : बदनापुरातून जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा निवडणूक रिंगणात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 18:09 IST

एकतर्फी लढत चुरशीची होणार 

ठळक मुद्दे१४ उमेदवार मैदानात 

- दिलीप सारडा

बदनापूर विधानसभा मतदारसंघात युती व आघाडीच्यावतीने जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशीची होणार असल्यामुळे यावेळेस बदनापूरचा गड कोण जिंकतो ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

गत निवडणुकीत युती व आघाडी नव्हती. त्यामुळे मतदारसंघाचे चित्र वेगळे होते. यावेळी युती व आघाडी झाली आहे. यामुळे यावेळची परिस्थिती बदली आहे. त्यातच मतदारसंघात वंचित, अपक्ष व मनसेने आपले उमेदवार उभा केल्याने युती व आघाडीच्या संकटात भर पडली आहे.  हे उमेदवारही आपले अस्तित्व दाखविण्यासाठी प्रचाराचा जोर वाढवित आहेत़ 

या निवडणुकीत आ. नारायण कुचे (भाजपा), बबलू चौधरी (राष्ट्रवादी), राजन मगरे (वंचित बहुजन आघाडी), राजेंद्र भोसले (मनसे) यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवारआ. नारायण कुचे हे आपल्या काळातील विकास कामांच्या जोरावर मते मागत असून, याच मतदारसंघातून दोन वेळेस विधानसभा निवडणूक लढलेले आघाडीचे बबलू चौधरी पुन्हा संधी देण्याची विनंती मतदारराजाकडे करीत आहेत. 

दुसरीकडे वंचितचे राजेंद्र मगरे, मनसेचे राजेंद्र भोसले, अपक्ष डॉ. अश्विनी गायकवाड यांनी सुध्दा मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिल्यामुळे सुरूवातीला सोपी वाटणारी निवडणूक मतविभाजनाच्या आकडेवारीत फसली असल्याने या मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.दरम्यान, या मतदारसंघात मुख्य लढत भाजपचे उमेदवार आ. नारायण कुचे व राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्यात होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत बदनापूरचा गड रोखल्या जातो की, पुन्हा ताब्यात घेतला जातो हे गुपित येणाऱ्या काळात उलगडणार आहे़

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना नियोजनाभावी बंद पडल्या. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न बिकट होत आहे. शेतीसाठी मुबलक सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे बागायती शेतीला पाणी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक विवचनेत सापडला आहे़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- बदनापूर शहरात कायम स्वरूपी पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे आजही महिन्याला पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागते.- मतदारसंघात बेरोजगार व मजुरांना काम नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर. या मतदारसंघात औद्योगिक वसाहत, मोठ-मोठे उद्योग उभारलेले नाही़ बेरोजगार तरूणांची संख्या जास्त. दर्जेदार सेवेअभावी शिक्षण, आरोग्याचे प्रश्न कायम. ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरुवस्था.

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची जमेची बाजूआ. नारायण कुचे (भाजप)- ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संपर्कठेवल्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी फळी. - सत्ताधारी असल्यामुळे ग्रामीण, शहरी भागात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकास कामे केली.- ग्रामपंचायतींवर भाजपचा ताबा

बबलु चौधरी (राष्ट्रवादी)- विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क. - राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात.- राष्ट्रवादीच्या आमदाराने केलेली विकास कामे. या त्यांच्या जमेच्या बाजू आहे.

राजेंद्र मगरे  (वंचित)- सरपंच म्हणून बदनापूरात केलेली विकास कामे. शहरातील प्रश्नांची माहिती व मोठा जनसंपर्क.- मतदारसंघात ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग.- विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क.

राजेंद्र भोसले (मनसे)- शिवसेनेत काम केल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व जनतेशी संपर्क़- अंबड येथील असल्यामुळे तालुक्यातील मतांचा फायदा. - राज ठाकरे यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात.- गावागावात मनसेचे कार्यकर्ते.

2०14चे चित्रनारायण कुचे (विजयी, भाजप)बबलु चौधरी (पराभूत, राष्ट्रवादी काँग्रेस ) 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jalanaजालनाbadnapur-acबदनापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा