शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

खरीप पिकांचे नुकसान; बळीराजा हवालदिल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:37 IST

दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला खरीप पिकांचा घास वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला खरीप पिकांचा घास वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने बळीराजामधून चिंता व्यक्त केली जात आहे.तालुक्याच्या उत्तर भागात यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस आहे. पिंपळगाव रेणुकाई, पारध, खुर्द, पारध बु, वालसांवगी, धावडा, जळगाव सपकाळ, आन्वा, दानापूर, शेलुद, वडोद तांगडा, हिसोडा, आडगाव, मोहळाई, अवघडराव सावंगी, आन्वा, वाकडी या गावांच्या परिसरात सोयाबीन, मका, मिरची, बाजरी, भुईमुग इ. पीके चांगली बहरून आली होती. यामुळे तीन वर्षांच्या दुष्काळाची भरपाई या खरीप हंगामात होईल, या आशेवर शेतकरी होते. पीके सुध्दा नजर लागेल अशीच आली आहेत. नेमकी ही पीके सद्यस्थितीत काढणीला आली असून, परतीच्या पावसाने या भागात कहर केला आहे. त्यामुळे सोयाबीन, मिरची, मका, ही पीके अतिवृष्टीमुळे हातची जाण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन या पीकाची सोंगणी केली आहे. त्याच बरोबर मका सुध्दा तोडली. मात्र, हे पीके जमीनीवर पडलेली असतानाच या पावसामुळे शेतक-याच्या तोंडी आलेला घास वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ या पावसाचा सर्वात मोठा फटका धावडा, पिंपळगाव रेणुकाई, पारध, जळगाव सपकाळ, आन्वा, वालसावंगी, अवघडराव सांवगी या भागात बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत असताना यंदा शेतक-याच्या तोंडी आलेला घास या पावसामुळे वाया जाण्याच्या भीती शेतक-यांमधून वर्तविली जात आहे.या भागातील शेतक-यांनी यंदा मोठ्या प्रमाणात खर्च करून कपाशीवरील रोगराईवर नियंत्रण मिळविले आहे. सद्य:स्थितीत कपाशीला मोठ्या प्रमाणात पाती लागले आहेत; परंतु पावसामुळे पातीगळ सुरू असल्याने कपाशीचे पीक केवळ वाढले आहे. यंदा कपाशीच्या उत्पन्नात घट होते की, काय? अशीही भीती शेतक-यांमधून वर्तविली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी