शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

खरीप पिकांचे नुकसान; बळीराजा हवालदिल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:37 IST

दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला खरीप पिकांचा घास वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला खरीप पिकांचा घास वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने बळीराजामधून चिंता व्यक्त केली जात आहे.तालुक्याच्या उत्तर भागात यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस आहे. पिंपळगाव रेणुकाई, पारध, खुर्द, पारध बु, वालसांवगी, धावडा, जळगाव सपकाळ, आन्वा, दानापूर, शेलुद, वडोद तांगडा, हिसोडा, आडगाव, मोहळाई, अवघडराव सावंगी, आन्वा, वाकडी या गावांच्या परिसरात सोयाबीन, मका, मिरची, बाजरी, भुईमुग इ. पीके चांगली बहरून आली होती. यामुळे तीन वर्षांच्या दुष्काळाची भरपाई या खरीप हंगामात होईल, या आशेवर शेतकरी होते. पीके सुध्दा नजर लागेल अशीच आली आहेत. नेमकी ही पीके सद्यस्थितीत काढणीला आली असून, परतीच्या पावसाने या भागात कहर केला आहे. त्यामुळे सोयाबीन, मिरची, मका, ही पीके अतिवृष्टीमुळे हातची जाण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन या पीकाची सोंगणी केली आहे. त्याच बरोबर मका सुध्दा तोडली. मात्र, हे पीके जमीनीवर पडलेली असतानाच या पावसामुळे शेतक-याच्या तोंडी आलेला घास वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ या पावसाचा सर्वात मोठा फटका धावडा, पिंपळगाव रेणुकाई, पारध, जळगाव सपकाळ, आन्वा, वालसावंगी, अवघडराव सांवगी या भागात बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत असताना यंदा शेतक-याच्या तोंडी आलेला घास या पावसामुळे वाया जाण्याच्या भीती शेतक-यांमधून वर्तविली जात आहे.या भागातील शेतक-यांनी यंदा मोठ्या प्रमाणात खर्च करून कपाशीवरील रोगराईवर नियंत्रण मिळविले आहे. सद्य:स्थितीत कपाशीला मोठ्या प्रमाणात पाती लागले आहेत; परंतु पावसामुळे पातीगळ सुरू असल्याने कपाशीचे पीक केवळ वाढले आहे. यंदा कपाशीच्या उत्पन्नात घट होते की, काय? अशीही भीती शेतक-यांमधून वर्तविली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी