शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

खरीप पिकांचे नुकसान; बळीराजा हवालदिल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:37 IST

दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला खरीप पिकांचा घास वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला खरीप पिकांचा घास वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने बळीराजामधून चिंता व्यक्त केली जात आहे.तालुक्याच्या उत्तर भागात यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस आहे. पिंपळगाव रेणुकाई, पारध, खुर्द, पारध बु, वालसांवगी, धावडा, जळगाव सपकाळ, आन्वा, दानापूर, शेलुद, वडोद तांगडा, हिसोडा, आडगाव, मोहळाई, अवघडराव सावंगी, आन्वा, वाकडी या गावांच्या परिसरात सोयाबीन, मका, मिरची, बाजरी, भुईमुग इ. पीके चांगली बहरून आली होती. यामुळे तीन वर्षांच्या दुष्काळाची भरपाई या खरीप हंगामात होईल, या आशेवर शेतकरी होते. पीके सुध्दा नजर लागेल अशीच आली आहेत. नेमकी ही पीके सद्यस्थितीत काढणीला आली असून, परतीच्या पावसाने या भागात कहर केला आहे. त्यामुळे सोयाबीन, मिरची, मका, ही पीके अतिवृष्टीमुळे हातची जाण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन या पीकाची सोंगणी केली आहे. त्याच बरोबर मका सुध्दा तोडली. मात्र, हे पीके जमीनीवर पडलेली असतानाच या पावसामुळे शेतक-याच्या तोंडी आलेला घास वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ या पावसाचा सर्वात मोठा फटका धावडा, पिंपळगाव रेणुकाई, पारध, जळगाव सपकाळ, आन्वा, वालसावंगी, अवघडराव सांवगी या भागात बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील तीन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत असताना यंदा शेतक-याच्या तोंडी आलेला घास या पावसामुळे वाया जाण्याच्या भीती शेतक-यांमधून वर्तविली जात आहे.या भागातील शेतक-यांनी यंदा मोठ्या प्रमाणात खर्च करून कपाशीवरील रोगराईवर नियंत्रण मिळविले आहे. सद्य:स्थितीत कपाशीला मोठ्या प्रमाणात पाती लागले आहेत; परंतु पावसामुळे पातीगळ सुरू असल्याने कपाशीचे पीक केवळ वाढले आहे. यंदा कपाशीच्या उत्पन्नात घट होते की, काय? अशीही भीती शेतक-यांमधून वर्तविली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी