शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

रिमझिम पावसामुळे जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:54 IST

दोन ते तीन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : दोन ते तीन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु, तलाव, विहिरी कोरड्याठाक असल्याने तालुक्यात पाणीटंचाई कायम आहे. परिणामी, नागरिकांना पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.यावर्षी पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु, दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके जगली आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीच केली नव्हती.घनसांवगी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ११ हजार ७७ हेक्टर एवढे आहे. यातील ९९ हजार ४१५ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. तर उवर्रित क्षेत्र पडीत आहे. तालुक्यातील घनसांवगी, पिंपळगाव, तीर्थपुरी, राणीउंचेगाव, आंतरवाली टेंभी व जांबसमर्थ या सात महसूल मंडळात ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ४९ हजार २१३ हेक्टरवर कापूस, १ हजार ३७० हेक्टरवर बाजरी, १३ हजार १०० हेक्टरवर सोयाबीन, ३ हजार ५०१ हेक्टरवर मूग, ४८८ हेक्टरवर मका, ५४ हेक्टरवर उडीदाची पेरणी झाली आहे.दरम्यान, या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतक-यांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकरी खत व मशागतीच्या कामात व्यस्त आहे. दरम्यान, तलाव, विहिरी व कोरड्याठाक असल्याने तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाई कायम आहे. तालुक्यात उन्हाळ्यात १०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या ४० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, दमदार पाऊस नसल्याने तालुक्यातील तलाव कोरडेठाक आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीकपात