शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

रिमझिम पावसामुळे जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:54 IST

दोन ते तीन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : दोन ते तीन दिवसांपासून घनसावंगी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु, तलाव, विहिरी कोरड्याठाक असल्याने तालुक्यात पाणीटंचाई कायम आहे. परिणामी, नागरिकांना पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.यावर्षी पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु, दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके जगली आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीच केली नव्हती.घनसांवगी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ११ हजार ७७ हेक्टर एवढे आहे. यातील ९९ हजार ४१५ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. तर उवर्रित क्षेत्र पडीत आहे. तालुक्यातील घनसांवगी, पिंपळगाव, तीर्थपुरी, राणीउंचेगाव, आंतरवाली टेंभी व जांबसमर्थ या सात महसूल मंडळात ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ४९ हजार २१३ हेक्टरवर कापूस, १ हजार ३७० हेक्टरवर बाजरी, १३ हजार १०० हेक्टरवर सोयाबीन, ३ हजार ५०१ हेक्टरवर मूग, ४८८ हेक्टरवर मका, ५४ हेक्टरवर उडीदाची पेरणी झाली आहे.दरम्यान, या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतक-यांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकरी खत व मशागतीच्या कामात व्यस्त आहे. दरम्यान, तलाव, विहिरी व कोरड्याठाक असल्याने तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाई कायम आहे. तालुक्यात उन्हाळ्यात १०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या ४० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, दमदार पाऊस नसल्याने तालुक्यातील तलाव कोरडेठाक आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

 

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीकपात