शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

अंबड येथील साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST

अशोक डोरले लोकमत न्यूज नेटवर्क अंबड : मराठतील आद्य कवयित्री म्हणून महदंबा यांचे नाव मोठ्या आदराने साहित्य क्षेत्रात घेतले ...

अशोक डोरले

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबड : मराठतील आद्य कवयित्री म्हणून महदंबा यांचे नाव मोठ्या आदराने साहित्य क्षेत्रात घेतले जाते. असे असले तरी या कवयित्रीच्या जन्मगावी त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून एक भव्य स्मारक होऊन तेथे साहित्य उपक्रमांची रेलचेल सतत राहावी असा सूर मान्यवरांनी आळवला आहे. एकूणच या महदंबने जे साहित्य रचले आहे, त्याला आजही तोड नसून, महानुभाव पंथाच्या तत्व्नावरून चालतांना साधारपणे आठशे वर्षापूर्वी जालना जिल्ह्यात एवढी बुध्दीमान कवयित्री जन्माला आल्याने त्याचे सर्वत्र कौतूक आहे.

रामसगाव या गावाचं ऐतिहासिक महत्त्व आहे .अनेक लोककथा येथील जनतेने मोठ्या निष्ठेने जपलेल्या आहेत. येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी नदीवर लोकांच्या सोयीसाठी घाट बांधलेला आहे .

मराठी साहित्यातली पहिली कवयित्री महदंबा यांचे हे गाव. महदंबा यांच्या पतीच्या वंशजांकडे यादव राजाचे पौरोहित्य होते, असे म्हणतात. तसेच या गावात नरसिंहाचे देवस्थान ही आहे. येथे दरवर्षी नरसिंह जन्मोत्सव सोहळा साजरा होतो .

महदंबा यांचा कार्यकाळ हा . १२२८ ते १३०३ आद्य मराठी कवयित्री. महदायिसा ह्या नावानेही त्यांची ओळख आहे. महानुभाव पंथीय असून लीळाचरित्र, श्रीगोविंदप्रभुचरित्र, स्मृतिस्थळ आणि इतिहास ह्या महानुभावीय ग्रंथावरून त्यांचा काही चरित्रात्मक तपशील मिळतो. देवगिरीचा राजा महादेवराय यादव ह्याचे पुरोहित वामनचार्य ह्यांच्या कुळात महदंबेचा जन्म झाला. वामनाचायार्चा पुत्र महेश्वरपंडित ह्याला माधवभट आणि बायेनायेक असे दोन पुत्र होते. महदंबा ही बायेनायेक ह्याची कन्या. महानुभाव पंथीयांचे आद्य आचार्य नागदेवाचार्य माधवभटाचे पुत्र होत. म्हणजे नागदेवाचार्य व महदंबा ही चुलत भावंडे. महदंबेला बालपणीच वैधव्य आले. ती अत्यंत विरक्त आणि बुद्धिमान होती, असे महानुभाव पंथीय ग्रंथातील तिच्यासंबंधीचे उल्लेख पाहून वाटते.

महदंबेची ख्याती तिने रचिलेल्या ह्यधवळ्यांह्णवर (कृष्णरुक्मिणी-विवाहावर तिने रचिलेली गीते) मुख्यत: अधिष्ठित आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे ह्या धवळ्यांचे दोन भाग आहेत. साधी, सुंदर रचना हे ह्या धवळ्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य. धवळ्यांचा पूर्वार्ध पूर्णत: महदंबेचा असून उत्तरार्धाच्या रचनेसाठी म्हाइंभट्ट आणि लक्ष्मीधरभट ह्या दोन महानुभाव पंडितांचे साहाय्य तिला झालेले दिसते. धवळ्यांचा पूर्वार्ध पूर्णत: महदंवेचा असून उत्तरार्धाच्या सचनेसाठी म्हाइंभट्ट आणि लक्ष्मीधरभट ह्या गोन महानुभाव पंडितांचे साहाय्य तिला झालेले दिसते. धवळ्यांचा पूर्वार्ध १२८७ च्या पूर्वी आणि उत्तरार्ध १३०३ च्या पूर्वी रचिला गेला असावा.

महदंबेच्या नावावर मातृकीरुक्मिणीस्वयंवर आणि गर्भकांड ओव्या अशा दोन रचनाही आहेत. कृष्णरुक्मिणीविवाह हाच मातृकीरुक्मिणीस्वयंवराचाही विषय. प्रत्येक ओवीच्या प्रारंभी एक अशा प्रकारे बावन्न मातृका ह्या काव्यात असल्यामुळे त्यास मातृकीरुक्मिणीस्वयंवर असे नाव आहे. ह्या काव्यातूनही धवळ्यांचे प्रतिसाद अपिरहार्यपणे उमटलेले आहेत. गर्भकांड ओव्या हे एक आध्यात्मिक प्रकरण आहे.----------

-----------------------------------------------------------------------------------------

.

महदंबा यांनी वास्तव मांडले.

श्री चक्रधर स्वामी यांच्या अत्यंत जवळच्या शिष्य .तत्कालीन सामाजिक जीवनाचं वास्तव चित्रण त्यांनी धवळ्यांमधून केलं .सहज उत्कट आविष्कार म्हणजे धवळे .लग्नातील गाणे व स्त्रीसुलभ भावना या मधून प्रकट झालेले आहेत .

.डॉ.प्रल्हाद लुलेकर,

प्रसिद्ध साहित्यिक.

रामसगाव येथे त्यांचे स्मारक व्हावे तसेच या गावाला कवितेचे गाव म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी महदंबा,भूमीजन,भानुकवी, महानुभाव या चार संमेलनात झाली आहे. परंतु शासनाने अजून पर्यंत त्याची दखल घ्यावी .

भारतभूषण शास्त्री

महानूभव साहित्याचे अभ्यासक,

अंबड.