शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

अंबड येथील साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST

अशोक डोरले लोकमत न्यूज नेटवर्क अंबड : मराठतील आद्य कवयित्री म्हणून महदंबा यांचे नाव मोठ्या आदराने साहित्य क्षेत्रात घेतले ...

अशोक डोरले

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबड : मराठतील आद्य कवयित्री म्हणून महदंबा यांचे नाव मोठ्या आदराने साहित्य क्षेत्रात घेतले जाते. असे असले तरी या कवयित्रीच्या जन्मगावी त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून एक भव्य स्मारक होऊन तेथे साहित्य उपक्रमांची रेलचेल सतत राहावी असा सूर मान्यवरांनी आळवला आहे. एकूणच या महदंबने जे साहित्य रचले आहे, त्याला आजही तोड नसून, महानुभाव पंथाच्या तत्व्नावरून चालतांना साधारपणे आठशे वर्षापूर्वी जालना जिल्ह्यात एवढी बुध्दीमान कवयित्री जन्माला आल्याने त्याचे सर्वत्र कौतूक आहे.

रामसगाव या गावाचं ऐतिहासिक महत्त्व आहे .अनेक लोककथा येथील जनतेने मोठ्या निष्ठेने जपलेल्या आहेत. येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी नदीवर लोकांच्या सोयीसाठी घाट बांधलेला आहे .

मराठी साहित्यातली पहिली कवयित्री महदंबा यांचे हे गाव. महदंबा यांच्या पतीच्या वंशजांकडे यादव राजाचे पौरोहित्य होते, असे म्हणतात. तसेच या गावात नरसिंहाचे देवस्थान ही आहे. येथे दरवर्षी नरसिंह जन्मोत्सव सोहळा साजरा होतो .

महदंबा यांचा कार्यकाळ हा . १२२८ ते १३०३ आद्य मराठी कवयित्री. महदायिसा ह्या नावानेही त्यांची ओळख आहे. महानुभाव पंथीय असून लीळाचरित्र, श्रीगोविंदप्रभुचरित्र, स्मृतिस्थळ आणि इतिहास ह्या महानुभावीय ग्रंथावरून त्यांचा काही चरित्रात्मक तपशील मिळतो. देवगिरीचा राजा महादेवराय यादव ह्याचे पुरोहित वामनचार्य ह्यांच्या कुळात महदंबेचा जन्म झाला. वामनाचायार्चा पुत्र महेश्वरपंडित ह्याला माधवभट आणि बायेनायेक असे दोन पुत्र होते. महदंबा ही बायेनायेक ह्याची कन्या. महानुभाव पंथीयांचे आद्य आचार्य नागदेवाचार्य माधवभटाचे पुत्र होत. म्हणजे नागदेवाचार्य व महदंबा ही चुलत भावंडे. महदंबेला बालपणीच वैधव्य आले. ती अत्यंत विरक्त आणि बुद्धिमान होती, असे महानुभाव पंथीय ग्रंथातील तिच्यासंबंधीचे उल्लेख पाहून वाटते.

महदंबेची ख्याती तिने रचिलेल्या ह्यधवळ्यांह्णवर (कृष्णरुक्मिणी-विवाहावर तिने रचिलेली गीते) मुख्यत: अधिष्ठित आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे ह्या धवळ्यांचे दोन भाग आहेत. साधी, सुंदर रचना हे ह्या धवळ्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य. धवळ्यांचा पूर्वार्ध पूर्णत: महदंबेचा असून उत्तरार्धाच्या रचनेसाठी म्हाइंभट्ट आणि लक्ष्मीधरभट ह्या दोन महानुभाव पंडितांचे साहाय्य तिला झालेले दिसते. धवळ्यांचा पूर्वार्ध पूर्णत: महदंवेचा असून उत्तरार्धाच्या सचनेसाठी म्हाइंभट्ट आणि लक्ष्मीधरभट ह्या गोन महानुभाव पंडितांचे साहाय्य तिला झालेले दिसते. धवळ्यांचा पूर्वार्ध १२८७ च्या पूर्वी आणि उत्तरार्ध १३०३ च्या पूर्वी रचिला गेला असावा.

महदंबेच्या नावावर मातृकीरुक्मिणीस्वयंवर आणि गर्भकांड ओव्या अशा दोन रचनाही आहेत. कृष्णरुक्मिणीविवाह हाच मातृकीरुक्मिणीस्वयंवराचाही विषय. प्रत्येक ओवीच्या प्रारंभी एक अशा प्रकारे बावन्न मातृका ह्या काव्यात असल्यामुळे त्यास मातृकीरुक्मिणीस्वयंवर असे नाव आहे. ह्या काव्यातूनही धवळ्यांचे प्रतिसाद अपिरहार्यपणे उमटलेले आहेत. गर्भकांड ओव्या हे एक आध्यात्मिक प्रकरण आहे.----------

-----------------------------------------------------------------------------------------

.

महदंबा यांनी वास्तव मांडले.

श्री चक्रधर स्वामी यांच्या अत्यंत जवळच्या शिष्य .तत्कालीन सामाजिक जीवनाचं वास्तव चित्रण त्यांनी धवळ्यांमधून केलं .सहज उत्कट आविष्कार म्हणजे धवळे .लग्नातील गाणे व स्त्रीसुलभ भावना या मधून प्रकट झालेले आहेत .

.डॉ.प्रल्हाद लुलेकर,

प्रसिद्ध साहित्यिक.

रामसगाव येथे त्यांचे स्मारक व्हावे तसेच या गावाला कवितेचे गाव म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी महदंबा,भूमीजन,भानुकवी, महानुभाव या चार संमेलनात झाली आहे. परंतु शासनाने अजून पर्यंत त्याची दखल घ्यावी .

भारतभूषण शास्त्री

महानूभव साहित्याचे अभ्यासक,

अंबड.