शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

खोतकर-गोरंट्याल यांच्या टाळीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:45 IST

गेल्या वर्षभरापासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातून विस्तवही आडवा जात नव्हता. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सर्वांसमोर खोतकर आणि गोरंट्याल यांनी प्रारंभी हस्तांदोलन केले आणि नंतर एकमेकांच्या हातावर टाळी दिली.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या वर्षभरापासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातून विस्तवही आडवा जात नव्हता. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सर्वांसमोर खोतकर आणि गोरंट्याल यांनी प्रारंभी हस्तांदोलन केले आणि नंतर एकमेकांच्या हातावर टाळी दिली.गेल्या तीस वर्षाचा जालन्याचा राजकीय इतिहास पाहिला तर कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर हे महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीतही त्यांचे शहरी आणि ग्रामीण पॅनल एकमेकांविरोधात उभे असायचे. त्यावेळी देखील अर्जुन खोतकर यांनी या निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले होते. अर्जुन खोतकरांची राजकीय कारकिर्द ही शिवसेनेतून सुरू झाली. वयाच्या २५ व्या वर्षी ते १९९० मध्ये जालन्याचे आमदार झाले. तर कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. ते १९९१ मध्ये पहिल्यांदा जालना पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नंतर १९९३ मध्ये कैलास गोरंट्याल हे नगराध्यक्ष झाले. आणि नंतर १९९९ मध्ये ते आणि खोतकर हे जालना विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर आले. त्यात खोतकर यांचा पराभव होऊन गोरंट्याल हे आमदार झाले होते. २००४ मध्ये पुन्हा या दोघांमध्ये थेट लढत झाली आणि आणि खोतकर विजयी झाले. २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांना शिवसेनेने राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदार संघात निवडणुक लढविण्याचे आदेश दिले. त्यावेळी तेथेही खोतकर यांनी राजेश टोपे यांना मोठी टक्कर देत ८३ हजार मते मिळवली. मात्र, ते तेथे पराभूत झाले होते. विधानसभेच्या त्याच निवडणुकीत जालना मतदार संघातून काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल विजयी झाले होते.बऱ्याच दिवसानंतर दोघेही एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलल्याने याचे वेगळे अर्थ काढले जात होते. खोतकर आणि गोरंट्याल यांच्यातील ही टाळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखरपेरणी तर नाही ना.. असेही तर्कवितर्क लावले जात आहेत.विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी जालना विधानसभेतून निवडणूक लढविली त्यावेळी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी हे कैलास गोरंट्यालच होते. या निवडणुकीत खोतकर यांचा २९६ मतांनी विजय झाला होता. याच निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतांना द्यावा लागणारा बी फॉर्म खोतकर यांनी वेळेत दाखल न केल्याचा मुद्दा उपस्थित करून कैलास गोरंट्याल यांनी याला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते.ही याचिका न्यायालयाने निकाली काढून, आ. अर्जुन खोतकर यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द ठरविले होते. या औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अर्जुन खोतकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावेळी त्यांच्या सदस्यत्व रद्दला स्थगिती देण्यात आली. मात्र आता या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून, १० मे रोजीची तारीख देण्यात आली आहे. असे असतानाच शुक्रवारी झालेल्या जाहीर कार्यक्रमात ही टाळी दोघांनी एकमेकांना कोणत्या मुद्यावरून दिली, याची सभागृहात लगेचच कुजबूज सुरू झाली.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरPoliticsराजकारण