शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

खरीप हंगाम; कृषी विभागाने घेतले बियाणे, खतांचे नमुने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 1:07 AM

बोगस बियाणे तसेच खतांची भेसळ रोखण्यासाठी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने बियाणांचे २७० तर खतांचे जवळपास १९२ नमुने घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी सुरूवात केल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. या हंगामात शेतकऱ्यांची बोगस बियाणे तसेच खतांची भेसळ रोखण्यासाठी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने बियाणांचे २७० तर खतांचे जवळपास १९२ नमुने घेतले आहेत. यातील नांदेडच्या एका मिश्र खत उत्पादक कंपन्या नमुन्यांमध्ये निकष असलेले घटक आढळून न आल्याने त्या खतांची विक्री थांबवली आहे.जालना जिल्ह्यात खरिपाचे एकणू पाच लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकरी पेरणीच्या कामांना गती आली आहे.अनेक शेतक-यांनी नांगरणी यापूर्वीच केली होती. आता लहान-सहान गवताच्या काड्यांचा भुगा करण्यासाठी ट्रॅक्टरव्दारे रोटावेटर मारण्याच्या कामांना वेग आला असून, शेती कामांना ट्रॅक्टर मिळणे अवघड झाले आहे.बांध बंदिस्ती करण्यासाठी जेसीबीची कमतरता देखील जाणवत आहे. दुसरीकडे दुष्काळात अनेक शेतक-यांनी आपले पशुधन हे कवडीमोल दराने विक्री केले. त्याचाही परिणाम शेतीवर होत आहे.आज अनेकजण एकमेकांना बैलजोडी देऊन मदत करत आहेत. एक आठवडा एकाच्या तर दुस-या आठवड्यात दुस-या शेतक-यांडे पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यात येत असल्याचे शेतक-यांनी सांगितले. जालना जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या बियाणांचे संकलन करून त्याचे नमुने हे औरंगाबाद तसेच नागपूर येथील प्रयोगशाळेकडे पाठविले असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, नांदेड येथील एका मिश्र खतांच्या निर्मितीच्या नमुन्यांमध्ये जे घटक खतांमध्ये असायला हवे होते. ते दिसून न आल्याने त्यांच्या खतांच्या साठ्याला विक्री बंदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा गुणनियंक एस.डी. गरांडे यांनी दिली.शेतक-यांनी बॅच जपून ठेवण्याचे आवाहनआज जरी पेरणी झालेली नसली तरी, चांगल्या पाऊस पडल्यावर येत्या १५ दिवसात पेरणीला वेग येणार आहे. ही पेरणी करताना शेतक-यांनी ज्या कंपनीचे बियाणे आणून खरेदी केली आहे, त्यावेळी त्या कंपनीचे नाव, त्या बियाणे पिशवीवर असलेला बॅच क्रमांक हा सांभाळून ठेवावा. जेणेकरून पेरणी केल्यावर जर त्या बियाणांची उगवण झाली नाही, त्यावेळी हा बॅच महत्वाची भूमिका निभावू शकतो. या बॅचमुळे नंतर संबंधित कंपनीविरूध्द कारवाई करण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीGovernmentसरकार