शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जुई नदीला पूर; वर्गखोल्यांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:03 IST

अन्वा येथील जुई नदीला आलेल्या पुराचे पाणी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये घुसल्याने विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याच्या विविध भागांत गत दोन दिवसांत पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. बुधवारी भोकरदन तालुका व परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे भोरखेडा येथील शाळेच्या तीन वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले. तर अन्वा येथील जुई नदीला आलेल्या पुराचे पाणी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये घुसल्याने विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागले. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८.८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८.८५ मिमी पाऊस झाला. अंबड व परतूर परिसरात या कालावधीत पाऊस झाला नाही. उर्वरित तालुकानिहाय आकडेवारी पाहता जालना तालुक्यात २.५० मिमी, बदनापूर- ३.२०, भोकरदन ३६.७५, जाफ्राबाद १२.७, मंठा- १५, घनसावंगी ०.७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.भोकरदन तालुका व परिसरात बुधवारी दमदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात भोरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील तीन वर्गखोल्यांवरील पत्रे उडून गेले. तसेच वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले. या शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे केली. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने नवीन वर्गखोल्या बांधून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.आन्वा येथील जुई नदीला बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूर आला. या नदीचे पाणी आन्वा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात घुसले. अनेक वर्गखोल्यांमध्ये पाणी-पाणी झाल्याने येथील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसूनच ज्ञानार्जन करावे लागले. या पावसामुळे आन्वा, वाकडी, कुकडी भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वाकडी शिवारातील जमिनीचे प्रशासनाने पंचनामे केले.

टॅग्स :floodपूरriverनदीRainपाऊसSchoolशाळा