शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जुई धरणातील सांडव्याच्या भिंतीला पडले भगदाड; पाणी पातळी वाढल्यास अपघाताची भीती

By शिवाजी कदम | Updated: August 8, 2023 19:27 IST

परिसरातील २५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणातून सुमारे ६०० हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आलेली आहे.

- अब्दुल रऊफ शेख

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. सध्या धरण पूर्णपणे कोरडे झाल्याने ही बाब निदर्शनास आली आहे. भिंतीच्या बाजूला काम सुरू असल्याने कामामुळे हे भगदाड पडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सिंचन विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केलेले नाही. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

परिसरातील २५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणातून सुमारे ६०० हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आलेली आहे. मात्र, यंदा हे धरण पूर्णपणे कोरडे झालेले आहे. यामुळे सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड उघड झाले आहे. या धरणाच्या बांधकामाला १९५८ मध्ये सुरुवात झाली होती. १९६२ च्या दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाला. सुरुवातीला या धरणातून केवळ रब्बी हंगामासाठी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत होते. परंतु, धरणातून भोकरदन शहरासह अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव कोठा ठरवण्यात आला. डाव्या कालव्याद्वारे सोडलेले पाणी गोदावरीपर्यंत सोडले जात आहे. मागील पाच वर्षांपासून धरण शंभर टक्के भरल्यानंतर ओसंडून वाहत होते. मात्र, यंदा धरणाने तळ गाठला असून, ते कोरडे पडले आहे.

दगड निखळलेकाही वर्षांपूर्वी धरणाच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी पाणी झिरपू नये म्हणून भिंतीला दगड बसवण्यात आले आहेत. मात्र सध्या हे दगड निखळले आहेत. यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हे भगदाड पाणी विसर्ग होऊन भिंत फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुरुस्तीसाठी वरिष्ठांची परवानगी मिळाली

जुई धरणाच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठांची परवानगी मिळालेली आहे. ज्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे. तेथील कामे तत्काळ सुरू करण्यात येतील. धरणाच्या भिंतीमुळे धोका निर्माण होणार नाही.- एम.जी. राठोड, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीDamधरण