शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

जुई धरणातील सांडव्याच्या भिंतीला पडले भगदाड; पाणी पातळी वाढल्यास अपघाताची भीती

By शिवाजी कदम | Updated: August 8, 2023 19:27 IST

परिसरातील २५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणातून सुमारे ६०० हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आलेली आहे.

- अब्दुल रऊफ शेख

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. सध्या धरण पूर्णपणे कोरडे झाल्याने ही बाब निदर्शनास आली आहे. भिंतीच्या बाजूला काम सुरू असल्याने कामामुळे हे भगदाड पडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सिंचन विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केलेले नाही. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

परिसरातील २५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणातून सुमारे ६०० हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आलेली आहे. मात्र, यंदा हे धरण पूर्णपणे कोरडे झालेले आहे. यामुळे सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड उघड झाले आहे. या धरणाच्या बांधकामाला १९५८ मध्ये सुरुवात झाली होती. १९६२ च्या दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाला. सुरुवातीला या धरणातून केवळ रब्बी हंगामासाठी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत होते. परंतु, धरणातून भोकरदन शहरासह अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव कोठा ठरवण्यात आला. डाव्या कालव्याद्वारे सोडलेले पाणी गोदावरीपर्यंत सोडले जात आहे. मागील पाच वर्षांपासून धरण शंभर टक्के भरल्यानंतर ओसंडून वाहत होते. मात्र, यंदा धरणाने तळ गाठला असून, ते कोरडे पडले आहे.

दगड निखळलेकाही वर्षांपूर्वी धरणाच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी पाणी झिरपू नये म्हणून भिंतीला दगड बसवण्यात आले आहेत. मात्र सध्या हे दगड निखळले आहेत. यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हे भगदाड पाणी विसर्ग होऊन भिंत फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुरुस्तीसाठी वरिष्ठांची परवानगी मिळाली

जुई धरणाच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठांची परवानगी मिळालेली आहे. ज्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे. तेथील कामे तत्काळ सुरू करण्यात येतील. धरणाच्या भिंतीमुळे धोका निर्माण होणार नाही.- एम.जी. राठोड, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीDamधरण