शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

जामखेडच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:08 IST

अंबड तालुक्यातील जामखेड येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

रूपेश मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अधिग्रहित केलेल्या दोन विहिरी आटल्या असून, ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पशुधन देखील संकटात सापडले आहे.जामखेड गावाची लोकसंख्या पंधरा हजार असून, आठ हजार जवळपास मतदार आहेत. सतरा सदस्य व सरपंच असे एकूण अठरा सदस्यांची ग्रामपंचायत कार्यकारिणी आहे. गेल्या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अत्यल्प प्रमाणात पर्जन्यमान्य झाले. त्यामुळे पुढील काळात भीषण पाणीटंचाई जाणवणार याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. जामखेड येथील दहा हातपंप, चार सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे येथे तीव्र पाणीटंचाई भासत आहे.जामखेड गावांसाठी २०१२ साली माजी जिल्हा परिषद सभापती बप्पासाहेब गोल्डे यांनी सव्वा कोटी रुपयांची ग्रामीण पाणी पुरवठा पेयजल योजना मजूंर करुन आणली होती. परंतु, शुन्य नियोजनामुळे गावातील अंतर्गत पाईपलाइन अद्यापही अपुर्ण आहे.अंबड तालुक्यातील जामखेड हे गाव सर्वात मोठे आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग असून, मोठी आर्थिक उलाढाल होते.सध्या गावाला पाणी पुरवठा करणा-या विहिरींनी तळ गाठला असून, गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी दोन शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. मात्र, अधिग्रहण केलेल्या विहिरींनीही तळ गाठला आहे.परिणामी, नागरिकांना खाजगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. सरपंच हलीमाबी इब्राहिम कुरेशी यांनी मार्च महिन्यात प्रशासनाकडे चार टँकरचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले होते. मात्र, दोन टँकरच सुरु करण्यात आले आहे.तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जनावारांच्या चा-याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. जनावरांना पाणी व चारा नसल्याने पशुपालक हैराण झाले आहे. नाइलाजाने त्यांना जनावरांची विक्री करावी लागत आहे. विक्रीसाठी गेलेल्या जनावरांचीही बेभाव विक्री होत असून, पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, जामखेड गावात प्रशासनाने जास्तीच्या टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.दोन हजार जनावरांच्या चा-याचा प्रश्नजामखेड या गावाची लोकसंख्या पंधरा हजार आहे. परंतु गावात फक्त दोन टँकरनेच पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाण्यामुळे अनेकवेळा ग्रामस्थांमध्ये वादही होतात. या गावात दोन हजार जनावरे आहे.त्यांच्या चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून कुठलीच मदत करण्यात येत नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई