शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

जामखेडच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:08 IST

अंबड तालुक्यातील जामखेड येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

रूपेश मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अधिग्रहित केलेल्या दोन विहिरी आटल्या असून, ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पशुधन देखील संकटात सापडले आहे.जामखेड गावाची लोकसंख्या पंधरा हजार असून, आठ हजार जवळपास मतदार आहेत. सतरा सदस्य व सरपंच असे एकूण अठरा सदस्यांची ग्रामपंचायत कार्यकारिणी आहे. गेल्या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अत्यल्प प्रमाणात पर्जन्यमान्य झाले. त्यामुळे पुढील काळात भीषण पाणीटंचाई जाणवणार याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. जामखेड येथील दहा हातपंप, चार सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे येथे तीव्र पाणीटंचाई भासत आहे.जामखेड गावांसाठी २०१२ साली माजी जिल्हा परिषद सभापती बप्पासाहेब गोल्डे यांनी सव्वा कोटी रुपयांची ग्रामीण पाणी पुरवठा पेयजल योजना मजूंर करुन आणली होती. परंतु, शुन्य नियोजनामुळे गावातील अंतर्गत पाईपलाइन अद्यापही अपुर्ण आहे.अंबड तालुक्यातील जामखेड हे गाव सर्वात मोठे आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग असून, मोठी आर्थिक उलाढाल होते.सध्या गावाला पाणी पुरवठा करणा-या विहिरींनी तळ गाठला असून, गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी दोन शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. मात्र, अधिग्रहण केलेल्या विहिरींनीही तळ गाठला आहे.परिणामी, नागरिकांना खाजगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. सरपंच हलीमाबी इब्राहिम कुरेशी यांनी मार्च महिन्यात प्रशासनाकडे चार टँकरचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले होते. मात्र, दोन टँकरच सुरु करण्यात आले आहे.तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जनावारांच्या चा-याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. जनावरांना पाणी व चारा नसल्याने पशुपालक हैराण झाले आहे. नाइलाजाने त्यांना जनावरांची विक्री करावी लागत आहे. विक्रीसाठी गेलेल्या जनावरांचीही बेभाव विक्री होत असून, पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, जामखेड गावात प्रशासनाने जास्तीच्या टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.दोन हजार जनावरांच्या चा-याचा प्रश्नजामखेड या गावाची लोकसंख्या पंधरा हजार आहे. परंतु गावात फक्त दोन टँकरनेच पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाण्यामुळे अनेकवेळा ग्रामस्थांमध्ये वादही होतात. या गावात दोन हजार जनावरे आहे.त्यांच्या चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून कुठलीच मदत करण्यात येत नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई