शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजार समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST

यंदा लग्नसराईमध्ये कपडा, भांडे, किराणा, इलेक्ट्राॅनिक, सोने, चांदी आदींची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. कॅटरिंग व्यावसायिकांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ...

यंदा लग्नसराईमध्ये कपडा, भांडे, किराणा, इलेक्ट्राॅनिक, सोने, चांदी आदींची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. कॅटरिंग व्यावसायिकांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बाजारात उत्साह दिसून येत आहे.

तुरीच्या दरांत मागील आठवड्यापासून तेजी सुरू झाली आहे. राज्यात तुरीची आवक चांगली आहे. जालना बाजारपेठेत तुरीची आवक दररोज आठ हजार पोते इतकी असून शंभर रुपयांची तेजी आल्यानंतर भाव ५२०० ते ५८५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सोयाबीनची आवक दररोज एक हजार पोते इतकी असून शंभर रुपयांची तेजी आल्यानंतर भाव ४२५० ते ४३५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. सोयाबीनचे दर भविष्यात तेजीतच राहतील, असा अंदाज आहे.

सरकारने आयात तेलाची टेरिफ व्हॅल्यू वाढवल्यामुळे सर्व प्रकारचे खाद्यतेल क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयांनी महागले आहेत. तेलावर सटोरियांची पकडही मजबूत आहे. त्यामुळेच तेलाचे दर मागील दोन महिन्यांपासून वाढतच आहेत. सोयाबीन तेल १२५००, सरकी तेल १२०००, पामतेल ११६००, शेंगदाणा तेल १४००, करडी तेल १६००० आणि सूर्यफूल तेलाचे दर १३६०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

गुळाची आवक दररोज ४ हजार भेली इतकी असून भाव २४५० ते ३२५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. साखरेचे दर ३३०० ते ३४५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

संक्रांतीनिमित्त तिळाला मोठी मागणी असून भाव १५० ते २०० रुपये प्रतिकिलो असे आहेत. जालन्यातील घेवर फेणी राज्याच्या बाहेरदेखील प्रसिद्ध आहे. बडी सडक भागात घेवर फेणीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. घेवर तसेच फेणीचे भाव ३०० ते ६०० रुपये प्रति किलो असे आहेत.

गहू, ज्वारी, मका आदी धान्यांपासून इथेनाॅल बनविण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे धान्य महागणार आहे. इथेनाॅलचा उपयोग पेट्रोलियम पदार्थ बनविण्यासाठी होईल तसेच डिटर्जंट पावडर, पेंट्स, परफ्यूम आदी उद्योगांमध्येही इथेनाॅल वापरता येईल. मात्र, यामुळे धान्य महागणार आहे.

गव्हाची आवक दररोज ५०० पोते इतकी असून भाव १६०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. ज्वारीची आवक दररोज ४०० पोते इतकी असून भाव १४०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. बाजरीची आवक दररोज ३०० पोते इतकी असून भाव ११०० ते १५५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. मक्याची आवक दररोज ५०० पोते इतकी असून भाव ११०० ते १३०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

हरभरा डाळीचे दर ५००० ते ५६००, तूर डाळ ८१०० ते ९५००, मूग डाळ ८००० ते ९५००, मसूर डाळ ६००० ते ७००० आणि उडद डाळीचे दर ७५०० ते १०००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

शेंगदाणा ८००० ते १००००, साबुदाणा ४१०० ते ४८००, पोहे ३००० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. नारळ ९५० ते ११०० रुपये प्रति ६० नग असे दर आहेत.