शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

Jalana: 'तलाठी प्रतिसाद देत नाहीत, पंचनामे कधी करणार?'; कृषिमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:02 IST

दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन; ‘कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान पंचनाम्याविना राहणार नाही, दिवाळीपूर्वी मदत देणार’

बदनापूर (जालना): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, गेवराई बाजार आणि गोकुळवाडी येथे आले असता, त्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. तलाठी पंचनाम्यासाठी येत नाहीत, पंचनामे होऊनही मदत मिळत नाही, अशा तक्रारी करत शेतकऱ्यांनी ‘सरसकट नुकसान भरपाई’ची मागणी लावून धरली.

'आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही'गेवराई बाजार शिवारात पाहणी सुरू असताना एका शेतकऱ्याने थेट मंत्र्यासमोरच आपली व्यथा मांडली. “माझी एक एकर शेती असून, जर मला नुकसान भरपाई मिळाली नाही, तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असे तो शेतकरी म्हणाला. या विधानाने कृषीमंत्री आणि उपस्थित अधिकारीही काही काळ अवाक् झाले. शेतकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनावर रोष व्यक्त केला. गुडघाभर पाणी साचलेल्या पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी कमालीचे संतप्त झाले होते.

पंचनामे तातडीने करण्याचे आदेशशेतकऱ्यांचा संताप पाहून कृषीमंत्री भरणे यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, “जालना जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात ६ लाख ३५ हजार एकर, तर राज्यात ८० लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाला मी सूचना देतो की, नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताचे पंचनामे झालेच पाहिजेत. एकही एकर क्षेत्र पंचनाम्याविना राहू नये. खरडून गेलेली जमीन आणि विहिरींचेही पंचनामे करा.”

दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासनमदतीबद्दल बोलताना ते म्हणाले, “शेतकऱ्यांना पंचनामे झाल्यानंतर १० दिवसांत किंवा दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करू. अशा संकटाच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने वागावे.” आमदार नारायण कुचे यांनीही शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, सरपंच संतोष नागवे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfloodपूर