शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस प्रवाशांना चिरडत फलाटावर चढली; दोघांचा मृत्यू, पाच जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:10 IST

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट फलाटावर चढली, यावेळी समोरील प्रवाशांना बसने उडवले

अंबड : फलाट क्रमांक १ वर जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट फलाट क्रमांक 3 वर चढून ७ अंबड बस स्थानकावर आज दुपारी भीषण अपघात झाला. बसने यावेळी ७ प्रवाशांना उडवले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य ५ प्रवाशांना  जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख रणवीर कोळपे यांनी दिली.

अंबड आगारातून सिल्लोडला जाण्यासाठी बस ( क्र.एम.एच.20 बी.एल्.1606) दुपारी 1.15 वाजतां फ्लॅट क्र 1 वर चालक लावत होता. मात्र, नियंत्रण सुटल्याने बस फ्लॅट क्र 3 समोर वेगाने जात समोर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडकली. यात सात प्रवाशी जखमी झाले. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मुरलीधर आनंदरावं काळे ( 50 वर्ष रा.शेवगा)  आणि शेख खलील शेख उल्ला ( 40 वर्ष रा.जुना जालना) यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

जखमींची नावे: अनिता बंडू गुंजाळ वय 30 वर्ष फुले नगर अंबड,पार्वती धोंडीराम नवघरे वय 30 वर्ष रा.जामदाये ता.हिंगोली, पूजा कडुबा धोत्रे वय 4 वर्ष,हिना अलीम शेख वय 30 वर्ष रा.धाकलगाव,रेहाना शेख अलीम 1 वर्ष रा.धाकलगाव 

चौकशी सुरू आहेअपघातग्रस्त बसची तपासणी केल्यानंतर यांत्रिक बिघाड नसल्यानाचे यंत्र अभियंता चालन जालना यांच्या तपासणीत आढळून आले आहे. जखमीना महामंडळाच्या नियमानुसार उपचारासाठी खर्च देण्यात येईल.अपघातात जखमीना तातडीने रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरु आहे.-रणवीर कोळपे, आगार प्रमुख, बस स्थानक, अंबड

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू