शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून पाणी तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:27 IST

निम्न दुधनाचे पाणी तापू लागले असून, परभणीकडे पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधनाचे पाणी तापू लागले असून, परभणीकडे पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. परंतु, धरणात केवळ १४ .१५ टक्के जिवंत पाणीसाठा राहिला आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने निम्न दुधना प्रकल्पात पाणी साठ्यात वाढ झाली नाही. पूर्ण पावसाळ््यात केवळ दहा टक्के पाणी साठा वाढला. या धरणावर परतूर, सेलूसह अनेक खेड्या - पाड्यांचा व सिंचनाचा भार आहे. यावर्षी धरणातून दोन ते तीन वेळा पाणी सोडण्यात आले.हे पाणी खाली नदीच्या पात्रात सोडल्याने पाण्याचा मोठा अपव्ययही होत आहे. मध्येच शेतकरीही या पाण्याचा उपसा करत आहे. या धरणातील बँक वॉटरवर शेतकऱ्यांनी लाखो रूपये कर्ज काढून पाईप लाईन केल्या आहेत.या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. आता धरणात पाणी कमी असल्याने व दररोजच्या उपशाने हे पाणी पातळी खालावत आहे. त्यामुळे शेतक-यांनाही पाणी मिळेल की, नाही या बाबत शंका आहे. यातच पुन्हा हे पाणी परभणीकडे सोडण्यासाठी मंत्रालय स्तरावर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.परभणी व जालन्याचे जिल्हाधिकारी पाणी सोडण्याचा निर्णय लवकरच घेणार आहेत. त्यामुळे आहे, ते पाणी कसे पुरेल या चिंतेत परतूरकर असल्याने हे पाणी आतापासून तापत आहे.या धरणात संध्या एकूण साठा १४.१५ टक्के आहे, तर एकूण पाणी साठा ३८ टक्के आहे. आता हे पाणी सोडण्यासाठी एक राजकीय गट प्रयत्नशील आहे. तर दुसरा गट आमचे ह्क्काचे पाणी सोडू देणार नाही, असा पावित्रा घेत विरोध करत आहे. त्यामुळे भविष्यात हे निम्न दुधनाचे पाणी चांगलेच ‘तापण्याची’ शक्यता वर्तविण्यात येत आहे.पाणी सोडण्याचा निर्णयही ब-याच अंशी राजकीय गणित मांडूनच घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाणी सोडायचे की, नाही हा कळीचा मुद्दा होऊ लागला आहे. या धरणातील पाणी पातळी दिवसेंदिवस घटु लागली आहे. या धरणावरच आता परतूर, सेलू शहरासह ३० ते ४० खेड्यांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. परत आता हे पाणी परभणीकडे सोडण्याचा घाट घातला जात असल्याने येत्या पावसाळ््यापर्यंत धरणातील पाणी पुरेल की नाही, या बाबत शंका आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई