शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून पाणी तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:27 IST

निम्न दुधनाचे पाणी तापू लागले असून, परभणीकडे पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधनाचे पाणी तापू लागले असून, परभणीकडे पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. परंतु, धरणात केवळ १४ .१५ टक्के जिवंत पाणीसाठा राहिला आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने निम्न दुधना प्रकल्पात पाणी साठ्यात वाढ झाली नाही. पूर्ण पावसाळ््यात केवळ दहा टक्के पाणी साठा वाढला. या धरणावर परतूर, सेलूसह अनेक खेड्या - पाड्यांचा व सिंचनाचा भार आहे. यावर्षी धरणातून दोन ते तीन वेळा पाणी सोडण्यात आले.हे पाणी खाली नदीच्या पात्रात सोडल्याने पाण्याचा मोठा अपव्ययही होत आहे. मध्येच शेतकरीही या पाण्याचा उपसा करत आहे. या धरणातील बँक वॉटरवर शेतकऱ्यांनी लाखो रूपये कर्ज काढून पाईप लाईन केल्या आहेत.या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. आता धरणात पाणी कमी असल्याने व दररोजच्या उपशाने हे पाणी पातळी खालावत आहे. त्यामुळे शेतक-यांनाही पाणी मिळेल की, नाही या बाबत शंका आहे. यातच पुन्हा हे पाणी परभणीकडे सोडण्यासाठी मंत्रालय स्तरावर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.परभणी व जालन्याचे जिल्हाधिकारी पाणी सोडण्याचा निर्णय लवकरच घेणार आहेत. त्यामुळे आहे, ते पाणी कसे पुरेल या चिंतेत परतूरकर असल्याने हे पाणी आतापासून तापत आहे.या धरणात संध्या एकूण साठा १४.१५ टक्के आहे, तर एकूण पाणी साठा ३८ टक्के आहे. आता हे पाणी सोडण्यासाठी एक राजकीय गट प्रयत्नशील आहे. तर दुसरा गट आमचे ह्क्काचे पाणी सोडू देणार नाही, असा पावित्रा घेत विरोध करत आहे. त्यामुळे भविष्यात हे निम्न दुधनाचे पाणी चांगलेच ‘तापण्याची’ शक्यता वर्तविण्यात येत आहे.पाणी सोडण्याचा निर्णयही ब-याच अंशी राजकीय गणित मांडूनच घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाणी सोडायचे की, नाही हा कळीचा मुद्दा होऊ लागला आहे. या धरणातील पाणी पातळी दिवसेंदिवस घटु लागली आहे. या धरणावरच आता परतूर, सेलू शहरासह ३० ते ४० खेड्यांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. परत आता हे पाणी परभणीकडे सोडण्याचा घाट घातला जात असल्याने येत्या पावसाळ््यापर्यंत धरणातील पाणी पुरेल की नाही, या बाबत शंका आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई