शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून पाणी तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:27 IST

निम्न दुधनाचे पाणी तापू लागले असून, परभणीकडे पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधनाचे पाणी तापू लागले असून, परभणीकडे पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. परंतु, धरणात केवळ १४ .१५ टक्के जिवंत पाणीसाठा राहिला आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने निम्न दुधना प्रकल्पात पाणी साठ्यात वाढ झाली नाही. पूर्ण पावसाळ््यात केवळ दहा टक्के पाणी साठा वाढला. या धरणावर परतूर, सेलूसह अनेक खेड्या - पाड्यांचा व सिंचनाचा भार आहे. यावर्षी धरणातून दोन ते तीन वेळा पाणी सोडण्यात आले.हे पाणी खाली नदीच्या पात्रात सोडल्याने पाण्याचा मोठा अपव्ययही होत आहे. मध्येच शेतकरीही या पाण्याचा उपसा करत आहे. या धरणातील बँक वॉटरवर शेतकऱ्यांनी लाखो रूपये कर्ज काढून पाईप लाईन केल्या आहेत.या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. आता धरणात पाणी कमी असल्याने व दररोजच्या उपशाने हे पाणी पातळी खालावत आहे. त्यामुळे शेतक-यांनाही पाणी मिळेल की, नाही या बाबत शंका आहे. यातच पुन्हा हे पाणी परभणीकडे सोडण्यासाठी मंत्रालय स्तरावर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.परभणी व जालन्याचे जिल्हाधिकारी पाणी सोडण्याचा निर्णय लवकरच घेणार आहेत. त्यामुळे आहे, ते पाणी कसे पुरेल या चिंतेत परतूरकर असल्याने हे पाणी आतापासून तापत आहे.या धरणात संध्या एकूण साठा १४.१५ टक्के आहे, तर एकूण पाणी साठा ३८ टक्के आहे. आता हे पाणी सोडण्यासाठी एक राजकीय गट प्रयत्नशील आहे. तर दुसरा गट आमचे ह्क्काचे पाणी सोडू देणार नाही, असा पावित्रा घेत विरोध करत आहे. त्यामुळे भविष्यात हे निम्न दुधनाचे पाणी चांगलेच ‘तापण्याची’ शक्यता वर्तविण्यात येत आहे.पाणी सोडण्याचा निर्णयही ब-याच अंशी राजकीय गणित मांडूनच घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाणी सोडायचे की, नाही हा कळीचा मुद्दा होऊ लागला आहे. या धरणातील पाणी पातळी दिवसेंदिवस घटु लागली आहे. या धरणावरच आता परतूर, सेलू शहरासह ३० ते ४० खेड्यांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. परत आता हे पाणी परभणीकडे सोडण्याचा घाट घातला जात असल्याने येत्या पावसाळ््यापर्यंत धरणातील पाणी पुरेल की नाही, या बाबत शंका आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई