शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

समृद्धी महामार्गावरील नियोजित इंटरचेंज पॉइंट स्थलांतराच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 12:02 AM

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील नियोजित इंटरचेंज पॉइंट (चढ-उतार स्थळ) जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असताना सदरील चढउतार स्थळ तेथून इतरत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरु झाल्या आहेत.

जालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील नियोजित इंटरचेंज पॉइंट (चढ-उतार स्थळ) जामवाडी, गुंडेवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असताना सदरील चढउतार स्थळ तेथून इतरत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरु झाल्या आहेत. समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने स्थलांतरणास विरोध दर्शविला असून स्थलांतर झाल्यास मुंबई येथील समृद्धी महामार्गाच्या कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष नारायण गजर यांनी दिला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिका-यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. जामवाडी, गुंडेवाडी, श्रीकृष्णनगर येथे नवनगर प्रस्तावित असून या गावांतील संपूर्ण शेतजमिनीवर तसे आरक्षण टाकण्यात आले आहे. चढउतार स्थळामुळे या भागातील दोनशे एकर शेतजमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी वर्षभरापूर्वी जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले असून त्यात या गावांच्या जमीन गटांचा समावेश आहे. इंटरचेंज पॉईंटसाठी जानेवारी २०१८ मध्ये मोजणी होणार होती. तथापि अचानक ही संयुक्त मोजणी थांबविण्यात आली. या पॉईंटमुळे बाधित शेतकर्यांना दिलासा मिळाला होता. शेतक-यांची मुले स्वयंरोजगार करु शकली असती त्यामुळे येथील शेतकरी समाधानी होती. मात्र, जालना शहरातील काही उद्योजकनी खातगाव येथे शेतजमिनी खरेदी करुन तेथे मुंबईतील उच्चपदस्थ अधिका-यांना हाताशी धरून इंटरचेंज पॉइंट हलविण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे तीस लक्ष प्रति एकर भावाने मिळण्याऐवजी खातगाव शिवारातील ऐंशी ते नव्वद लाख रुपये प्रति एकर दराने खरेदी कराव्या लागतील. त्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. निवेदनावर नारायण गजर, वैजीनाथ वैद्य, विजय लहाने, भरत कापसे, परमेश्वर कापसे, राजू गजर, बबन डवले, मोकींद लांडगे, बाबासाहेब गजर, गोविंद लहाने आदींच्या स्वाक्ष-या आहेत.