शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अंतर्गत पाणीपुरवठा योजना अडकणार चौकशीच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:34 AM

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकारने जालना पालिकेला १५० कोटी रूपये देऊ केले होते. त्यातून संबंधित कंपनीने आधी ९ जलकुंभ बांधणे आवश्यक असताना, आधी शहरातून पाईपलाइन टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकारने जालना पालिकेला १५० कोटी रूपये देऊ केले होते. त्यातून संबंधित कंपनीने आधी ९ जलकुंभ बांधणे आवश्यक असताना, आधी शहरातून पाईपलाइन टाकली.ही पाईपलाइन टाकत असताना डीपीआरमध्ये जो मार्ग ठरवून दिला होता, त्यानुसार कामे न करता मनमानी धोरण राबवून आणि बाहुबली नगरसेवकांच्या दबावाखाली येऊन कंपनीने पाईपलाइन अंथरल्याने आज जालन्यातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. असे असतानाच पालिकेने संबंधित एजन्सीची जवळपास ९६ कोटी रूपयांची देयके अदा केली आहेत. या सर्व प्रकारणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती खा. रावसाहेब दानवे यांनी दिली. शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, पूर्वीच्या केंद्र सरकारने जालन्यात पाणी आणण्यासाठी जायकवाडी ते जालना या योजनेसाठी २५० कोटी रूपये दिले . त्यानंतर जालन्याच्या वेशीवर पाणी पोहोचले होते, परंतु ते शहरातील विविध भागांत नेताना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आपण स्वत: यात पुढाकार घेऊन १५० कोटी रूपये विशेष बाब म्हणून जालना पालिकेला दिले. त्यातून त्यांनी नेमलेल्या एजन्सीकडून दर्जेदार आणि डीपीआर प्रमाणे कामे करून घेणे अपेक्षित होते, परंतु या कामाकडे ना ज्यांच्या हातात पालिका आहे, त्यांनी लक्ष दिले नसल्याचा गंभीर आरोप केला. जालन्याच्या पाणीप्रश्नावर दानवे तसेच उपनगराध्यक्ष राजेश राऊत, भाजपचे पालिकेतील गटनेते अशोक पांगारकर, नगरसेवक भास्कर दानवे, संध्या देठे, सतीश जाधव, यांच्यासह अन्य नगरसेवकांची उपस्थिती होती.यावेळी दुपारी दानवे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी अंतर्गत जलवाहिनीसह अन्य प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी दानवेंनी खांडेकर यांना चांगलेच धारेवर धरल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरात ६१ टँकरने पाणीपुरवठाजालना शहरातील अनेक भागांमध्ये पंधरा ते वीस दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे विविध भागांतील नागरिकांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपण शनिवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची संयुक्त बैठक घेतली. त्या बैठकीत आपण जालना शहरातील सर्व प्रभागांत एक टंँकर सुरू करण्यासह त्यांना गरज पडल्यास त्या टँकरच्या दोन फेºया वाढविण्याचे सांगितले. हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात येईल असे बिनवडे यांनी सांगितल्याचे दानवे म्हणाले. यावेळी राजेश राऊत यांनी देखील पाणीपुरवठा एजन्सीचे बिल देऊ नये, असा प्रस्ताव दिला होता या संदर्भात लेखी निवेदनही दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीraosaheb danveरावसाहेब दानवे