शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘जुई, धामणा’तील गाळ काढण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:56 IST

करदन तालुक्यात कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई व धामणा धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यात कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई व धामणा धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरिंचंद्र गवळी यांनी जुई धरणातील गाळाची पाहणी केली़यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील जुई आणि धामणा धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यां पासून ही धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे भोकरदन शहरासह किमान ३० गावांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. मात्र भविष्यामध्ये या धरणातील पाणी साठवण क्षमता वाढावी, यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या असून, मंगळवारी उपविभागीय अधिकारी व इतर अधिका-यांनी धरणांची पाहणी केली. शासनाने धरणातून गाळ काढून दिल्यावर शेतक-यांनी तो आपल्या शेतात घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे गवळी यांनी संगितले.उपविभागीय अधिकारी गवळी यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणातील गाळाची माहिती मागविली असून, आपण तात्काळ जुई व धामणा धरणातील गाळाची माहिती देणार आहोत. शेतक-यांनी हा गाळ घेऊन जाण्यासाठी जनजागृती करणार असून, प्रत्येक गावात दवंडी देऊन व बैठका घेऊन शेतक-यांना गाळ घेऊन जाण्याचे आवाहन करू असे ते म्हणाले.तालुक्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीरतालुक्यात सध्या कठीण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप तालुक्यात दुष्काळी कामे सुरू करण्यात आलेले नाही. शिवाय पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गुरांच्या चा-यासह पिण्यासाठी पाणी नाही. शासनाने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात येत आहे असे असले तरी गुरांसाठी अद्याप कोठेही चारा छावणी सुरू केलेली नाही. गुरांना पिण्यासाठी पाणी नाही. शिवाय चारा छावणी सुरू करावयाची असल्यास पद्मावती व बाणेगाव येथील मध्यम प्रकल्पाजवळच चारा छावण्या सुरू कराव्या लागणार आहेत. दुसरीकडे तालुक्यात कोठेही पाणी साठा नाही अशी परिस्थिती पाऊस कमी पडल्याने निर्माण झाली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प