शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

‘जुई, धामणा’तील गाळ काढण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:56 IST

करदन तालुक्यात कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई व धामणा धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यात कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई व धामणा धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरिंचंद्र गवळी यांनी जुई धरणातील गाळाची पाहणी केली़यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील जुई आणि धामणा धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यां पासून ही धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे भोकरदन शहरासह किमान ३० गावांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. मात्र भविष्यामध्ये या धरणातील पाणी साठवण क्षमता वाढावी, यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या असून, मंगळवारी उपविभागीय अधिकारी व इतर अधिका-यांनी धरणांची पाहणी केली. शासनाने धरणातून गाळ काढून दिल्यावर शेतक-यांनी तो आपल्या शेतात घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे गवळी यांनी संगितले.उपविभागीय अधिकारी गवळी यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणातील गाळाची माहिती मागविली असून, आपण तात्काळ जुई व धामणा धरणातील गाळाची माहिती देणार आहोत. शेतक-यांनी हा गाळ घेऊन जाण्यासाठी जनजागृती करणार असून, प्रत्येक गावात दवंडी देऊन व बैठका घेऊन शेतक-यांना गाळ घेऊन जाण्याचे आवाहन करू असे ते म्हणाले.तालुक्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीरतालुक्यात सध्या कठीण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप तालुक्यात दुष्काळी कामे सुरू करण्यात आलेले नाही. शिवाय पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गुरांच्या चा-यासह पिण्यासाठी पाणी नाही. शासनाने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात येत आहे असे असले तरी गुरांसाठी अद्याप कोठेही चारा छावणी सुरू केलेली नाही. गुरांना पिण्यासाठी पाणी नाही. शिवाय चारा छावणी सुरू करावयाची असल्यास पद्मावती व बाणेगाव येथील मध्यम प्रकल्पाजवळच चारा छावण्या सुरू कराव्या लागणार आहेत. दुसरीकडे तालुक्यात कोठेही पाणी साठा नाही अशी परिस्थिती पाऊस कमी पडल्याने निर्माण झाली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प