शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

गोदापात्रातून अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:24 AM

वाळू लिलावाच्या पावत्यात हेरफेर करुन अंबड तालुक्यताील आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू उपसा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देलिलाव पावत्यांचा गैरवापर : महसूल कडून पाठराखण

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : वाळू लिलावाच्या पावत्यात हेरफेर करुन अंबड तालुक्यताील आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू उपसा करण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रला धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे महसुल प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.गेल्या काही दिवसापासून आपेगाव परिसरातील गोदावरी पात्रातून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन रात्रदिवस वाळूची चोरी होत आहे. याकडे तलाठी, मंडळ अधिकाऱ्याचे कायम दुर्लक्ष होत आहे. याबाबत तक्रारी वाढल्याने शुक्रवारी सकाळी वाळूने भरलेल्या हायवा, आणि वाळू चे उत्खनन करत असलेला विनाक्रमांकाचा एक जेसीबी नदीपात्रातून जप्त केला. तलाठी कोनेरकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी जप्त करुन गोंदी पोलिसांच्या स्वाधीन केला. तलाठी रमेश कोनेरवार यांच्या फियार्दीवरून जेसीबी चालक रघुनाथ भागवत कातखेडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र संबधीताविरुध्द थातून मातूर करवाई करण्यात आली. कारवाई केल्यानंतरही अवैध उपसा थांबण्याचे नाव घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.विशेष म्हणजे सध्या पावसाने दडी दिल्याने नदी पात्रात पाणी नसल्याने वाळू उपसा करणाºयांची चांगलीच चलती आहे. याकडे वरिष्ठ लक्ष देतील का अशी विचारणा होत आहे.दुर्लक्ष : तस्करांना अभय कुणाचे?आपेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून जेसीबी यंत्राच्या सहाय्याने दिवस-रात्र हायवा भरून दिले जात असल्याने त्यांना अभय कुणाचे हा प्रश्न उपस्थित होत आहे.कारण ४५ ब्रॉस जप्त वाळूसाठा ३२ हजार रुपयात ५ दिवसात उचलण्याच्या आटीवर राजेंद्र चौधरी यांना देण्यात आलेला आहे.राजेंद्र चौधरी यांनी अजून ताबा घेतला नाही, तरीही आपेगावातून जेसीबी यंत्राच्या सहाय्याने दिवस-रात्र राजरोस अवैधवाळू तस्करी होते कशी? हा महसूलच्या वरिष्ठांसाठी संशोधनाचा विषय आहे, तर आपेगाव क्षेत्रात कार्यरत असलेल्या तलाठी व मंडाळाधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाRevenue Departmentमहसूल विभागsandवाळू