शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

हाताला काम नाही तर पोट कसं भरावं..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:48 IST

जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मनरेगाच्या माध्यमातून कामे देण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात हाताला काम नाही. त्यामुळे स्वत:चे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चिंतेतूनच परतूर, मंठा, घनसावंगी तालुक्यातील मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.या तीन तालुक्यांतील संतप्त मजुरांनी जालना जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. जवळपास ५० गावातील मजूरांनी कामाची मागणी केली असून, दररोज एका दिवशी एका गावातीलच मजूर उपोषणाला बसत आहेत.आज आम्ही कामासाठी आंदोलन करीत आहोत. येणाऱ्या काही दिवसांतच आम्हाला पाण्यासाठीही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. आम्हाला कामाबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे. मजुरांना काम देण्याचा मुद्दा मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेतही गाजला.यावेळी सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की, या मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी दोन दिवसांत नियोजन केले जाईल.निमा अरोरा यांच्या या आश्वासनाचे खालील अधिकारी आणि प्रशासन किती दखल घेतात, यावरच या परिसरातील ग्रामस्थांचा रोजगार अवलंबून राहणार आहे.पाण्यासाठीही करावी लागते भटकंतीआज आम्ही कामासाठी आंदोलन करीत आहे. तर येणा-या काही दिवसांतच आम्हाला पाण्यासाठीही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. कारण आम्हाला कामाबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे.माझ्याकडे शेती नाही. गावातही काम मिळत नाही. मुलांना शिक्षणासाठी मोठा खर्च लागतो. त्यातच काम मिळत नसल्याने पोट कसं भरावं, असा प्रश्न पडला आहे.- नामदेव कोरडे, आंबा

टॅग्स :droughtदुष्काळJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाagitationआंदोलन