शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

हाताला काम नाही तर पोट कसं भरावं..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:48 IST

जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील दुष्काळाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मनरेगाच्या माध्यमातून कामे देण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात हाताला काम नाही. त्यामुळे स्वत:चे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चिंतेतूनच परतूर, मंठा, घनसावंगी तालुक्यातील मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.या तीन तालुक्यांतील संतप्त मजुरांनी जालना जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. जवळपास ५० गावातील मजूरांनी कामाची मागणी केली असून, दररोज एका दिवशी एका गावातीलच मजूर उपोषणाला बसत आहेत.आज आम्ही कामासाठी आंदोलन करीत आहोत. येणाऱ्या काही दिवसांतच आम्हाला पाण्यासाठीही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. आम्हाला कामाबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे. मजुरांना काम देण्याचा मुद्दा मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेतही गाजला.यावेळी सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की, या मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी दोन दिवसांत नियोजन केले जाईल.निमा अरोरा यांच्या या आश्वासनाचे खालील अधिकारी आणि प्रशासन किती दखल घेतात, यावरच या परिसरातील ग्रामस्थांचा रोजगार अवलंबून राहणार आहे.पाण्यासाठीही करावी लागते भटकंतीआज आम्ही कामासाठी आंदोलन करीत आहे. तर येणा-या काही दिवसांतच आम्हाला पाण्यासाठीही आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. कारण आम्हाला कामाबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे.माझ्याकडे शेती नाही. गावातही काम मिळत नाही. मुलांना शिक्षणासाठी मोठा खर्च लागतो. त्यातच काम मिळत नसल्याने पोट कसं भरावं, असा प्रश्न पडला आहे.- नामदेव कोरडे, आंबा

टॅग्स :droughtदुष्काळJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाagitationआंदोलन