शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पहिला पेपर शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:47 AM

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला बुधवारी जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर शांततेत सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला बुधवारी जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर शांततेत सुरुवात झाली. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. शहरासह जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तासह सहा भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ६३ परीक्षाकेंद्रावर सकाळी अकरा वाजता परीक्षेला सुरुवात झाली. गत काही वर्षात प्रश्न पत्रिका फुटण्याचे प्रकार होत असल्याने या वेळी परीक्षा विभागाने आवश्यक खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात महिला पथकाचा समावेश आहे. जिल्ह्यात २७ हजार ८१७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यात विज्ञान शाखेचे ११ हजार ८०५, कला शाखेचे १३ हजार ४१६, वाणिज्य शाखेचे २२१० आणि एम.सी.व्ही चे ३८६ समावेश आहे. परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून राज्य परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी साडेदहा वाजताच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. याची कडक अंमलबजावणी झाल्याचे ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रावर पहावयास मिळाले. शहरातील परीक्षाकेंद्रावर वेळेत उपस्थित राहण्यासाठी परिक्षार्थीसह पालकवर्गाची धावपळ दिसून आली. पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपर असल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक सुरू होती. परीक्षार्थींना कुठल्याही प्रकारे वाहतूक कोंंडीचा त्रास होऊ नये म्हणून शहरातील प्रमुख मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा सेंटरवर पोहचण्यास मदत झाली. तसेच परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त दिसून आला. शहरासह आठही तालुक्यातील परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार न घडता पहिला पेपर विद्यार्थ्यांनी शांतेत सोडवला. केंद्रावर विद्यार्थ्यांना जागेवरच पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.शहरातील मत्स्योदरी महाविद्यालय, उर्दु हायस्कुल, सरस्वती भुवन प्रशाला, जेईएस महाविद्यालय, मल्टीपर्पज हायस्कूल, नुतन महाविद्यालय आदी सेंटरवर चोख पोलीस बंदोबस्त दिसून आला. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.