शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

अपघाताची वार्ता कळताच शंकरनगर शोकाकुल, अनेकांना अश्रू अनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 01:20 IST

भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील पाचही जण जागीच ठार झाल्याची माहिती कळताच शंकरनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औरंगाबाद येथील चुलत्याच्या तेराव्यासाठी (गोडजेवणासाठी) जुना जालना शंकरनगर भागातील रिक्षाचालक रमेश रामलाल जाधव यांच्या रिक्षातून बुधवारी सकाळी ८ वाजता रमेश व त्यांची पत्नी वगळता घरातील कुटुंब निघाले असताना औरंगाबाद जिल्ह्यातील शेकट्याच्या पुढे त्यांच्यावर काळाने घाला घातला. भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील पाचही जण जागीच ठार झाल्याची माहिती कळताच शंकरनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविणारे रमेश जाधव यांच्या चुलत्याचे दहा दिवसांपूर्वी औरंगाबादेतील बेगमपुरा येथे निधन झाले. त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम बुधवारी होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाधव कुटुंब स्वत:च्या रिक्षातून औरंगाबादकडे जात होते. रिक्षा दिनेश जाधव हे चालवत होते. ते औरंगाबादकडे जात असल्याने बरोबर डाव्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना कारने जोरदार धडक दिली. यात रिक्षातील पाचही जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच या प्रभागाचे नगरसेवक माऊली ढवळे तसेच त्यांच्या मित्रांनी औरंगाबाद गाठले. त्यांनी तेथे जाधव कुटुंबाला पूर्ण ती वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.जाधव कुटुंबातील मधला भाऊ रमेश जाधव आणि त्यांची पत्नी घरी थांबल्याने ते या अपघातातून बचावले. त्यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. दिवसभर ते व त्यांच्या पत्नीने पाण्याचा घोटही घेतला नाही. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.शंकरनगरात २५ वर्षांपासून वास्तव्यशंकरनगर परिसरात जाधव परिवार हा गेल्या २५ वर्षापासून वास्तव्यास आहे. त्यामुळे त्यांचे आणि शंकरनगरवासियांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याची माहिती त्यांच्याशेजारील प्राचार्य अ‍ॅड. दिनकर पाठक यांनी दिली. तसेच पूर्वीचे शिवसेनेचे नगरसेवक राम सतकर हे देखील मदतीसाठी धावून आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर जाधव कुटुंबाच्या घराजवळ विशेष करून महिलांनी मोठी गर्दी केली होती. अनेक ज्येष्ठ महिलांनी रमेश जाधव व त्यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे अश्रू पुसले. तसेच पाणी आणि दोन घास खाण्याची विनंती केली, परंतु त्यांनी कोणाची विनंती ऐकली नाही.शंकरनगर येथील जाधव कुटुंबातील दिनेश रामलाल जाधव (३२), रेणुका दिनेश जाधव (२५), अतुल दिनेश जाधव (६ महिने), वंदना गणेश जाधव (२७), सोहम गणेश जाधव (९) या पाच जणांवर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.जो तो जाधव कुटुंबांच्या आठवणी सांगत होता. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा जालन्यातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूSocialसामाजिक