शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

वरखेडा येथील ग्रामस्थांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:16 IST

ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : वरखेडा - विरो ता. जाफराबाद येथील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला तरी तो नियमित होत नाही. झाला तरी ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून वरखेडा - विरो येथे सद्यस्थितीत एका टँकरने दररोज ३ फेरी प्रमाणे पाणीपुरवठा करावा अशी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, टँकरची फेरी म्हणजेच १२ हजार लिटर पाणी देण्यात येते. गावातील जलकुंभाची क्षमता ६० हजार लिटर आहे. त्यामुळे किमान ३ दिवसाआड गावाला पाणी मिळाले पाहीजे. परंतु ११ एप्रिल पासून ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही. याच मुद्यावरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांना घेराव घालून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.या निवेदनावर समाधान राऊत, भारत राऊत, रामेश्वर साबळे, सांडू, साबळे, भीमराव राऊत, विशाल पोघर, योगेश ऊबाळे, लहु राऊत, सुभाष साबळे, गजानन राऊत, सिद्धार्थ राऊत, शाम राऊत, शुभम ऊबाळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.सरपंच व ग्रामसेवक हे हेतूपुरत्सर पाणी सोडण्यास टाळाटाळ करतात. काही भागांत दोन दिवसाआड तर, काही भागात महिना - महिना पाणी मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईagitationआंदोलनpanchayat samitiपंचायत समिती