शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वरखेडा येथील ग्रामस्थांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:16 IST

ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : वरखेडा - विरो ता. जाफराबाद येथील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला तरी तो नियमित होत नाही. झाला तरी ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून वरखेडा - विरो येथे सद्यस्थितीत एका टँकरने दररोज ३ फेरी प्रमाणे पाणीपुरवठा करावा अशी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, टँकरची फेरी म्हणजेच १२ हजार लिटर पाणी देण्यात येते. गावातील जलकुंभाची क्षमता ६० हजार लिटर आहे. त्यामुळे किमान ३ दिवसाआड गावाला पाणी मिळाले पाहीजे. परंतु ११ एप्रिल पासून ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही. याच मुद्यावरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांना घेराव घालून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.या निवेदनावर समाधान राऊत, भारत राऊत, रामेश्वर साबळे, सांडू, साबळे, भीमराव राऊत, विशाल पोघर, योगेश ऊबाळे, लहु राऊत, सुभाष साबळे, गजानन राऊत, सिद्धार्थ राऊत, शाम राऊत, शुभम ऊबाळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.सरपंच व ग्रामसेवक हे हेतूपुरत्सर पाणी सोडण्यास टाळाटाळ करतात. काही भागांत दोन दिवसाआड तर, काही भागात महिना - महिना पाणी मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईagitationआंदोलनpanchayat samitiपंचायत समिती