शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर जाऊन कृषी विभागाचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST

शेतकऱ्यांना दिलासा : बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका पारध : गतवर्षी झालेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करून पारध (ता. भोकरदन) परिसरातील ...

शेतकऱ्यांना दिलासा : बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका

पारध : गतवर्षी झालेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करून पारध (ता. भोकरदन) परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रबी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. सध्या पिकेही चांगली आली आहेत; परंतु मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोगराई पडली आहे. शेतकऱ्यांमधून होणारी मागणी पाहता आता कृषी विभागाच्या वतीने पिंपळगाव रेणुकाई मंडळात बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

यात शेतकऱ्यांना अळीला नियंत्रणात आणण्यासाठीच्या राबवायच्या उपाय- योजना याविषयी माहिती देण्यात येत आहे. शिवाय शेतकऱ्यांनी खचून न जाता कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी केले. गतवर्षी पारध परिसरातील शेतकऱ्यांना खरिपात अपेक्षित उत्पादन मिळाले नाही; परंतु पाऊस अधिकचा झाल्याने लघु- मध्यम प्रकल्प, पाझर तलाव, नदी, नाले, विहीर बोअर यांची पाणी पातळी मोठी वाढली होती. या पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी रबीतील गहू, हरभरासह इतर पिकांची पेरणी केली आहे. सध्या गव्हाला ओंब्या आल्या असून, हरभऱ्याला देखील काही ठिकाणी घाटे लागले आहेत. असे असताना मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. याचा परिणाम पिकांवर रोगराई पडण्यावर झाला आहे. रोगराईवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या ओषधांची पिकांवर फवारणी करीत आहेत; परंतु रोगराई अटोक्यात येत नाही.

एक एकर गहू, हरभरा याची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांचा खर्च येत आहे. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. या मागणीची दखल घेत तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. यात पिकांवरील रोगराई अटोक्यात आणण्यासाठी राबवायच्या उपाययोजना सांगितल्या जात आहेत.

चौकट

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात बुधवारी तालुका कृषी अधिकारी भुते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी जवस, ओवा, बडीशेप या आंतर पिकांकडेही लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. या पथकात कृषी सहायक मोहित पवार, रामेश्वर काळे आदींचा सहभाग होता.

फोटो ओळ : पिंपळगाव रेणुकाई मंडळात शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी मार्गदर्शन केले.