शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

रुग्ण आणि मृत्यू संख्येचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:32 IST

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा वेग प्रचंड होता. त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक होती; परंतु गेल्या दोन महिन्यांमध्ये ...

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा वेग प्रचंड होता. त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक होती; परंतु गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे या आजाराची भीती हळूहळू कमी होत आहे. असे असतानाच तज्ज्ञांकडून मात्र तिसऱ्या लाटेची भीती आणखी गडद असल्याचे दर्शविले जात असल्याचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकूणच जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी सर्वत्र घबराट पसरली होती; परंतु हळूहळू या आजाराविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती अधिक झाल्याने आजाराची तीव्रता कमी झाली आहे.

साधारण ऑगस्ट २०२० मध्ये २१४७६ चाचण्या केल्या होत्या, त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येही चाचण्यांचे प्रमाण लक्षणीय होते. डिसेंबरमध्ये या चाचण्यांचे प्रमाण कमी होऊन रुग्णसंख्याही घटली होती; परंतु नंतर जानेवारी २०२१ मध्ये चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार एप्रिल आणि मे मध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत ६० हजारपेक्षा अधिक चाचण्या झाल्या असून, त्यातून ६०४३६ जणांना कोरोनाची लागण झाली होती.

चौकट

कोरोनामुळे ११८६ जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात कोरोनामुळे ११८६ जणांचा मृत्यू हा २५ ऑगस्टपर्यंत झाला आहे. यात अंबड १३७, बदनापूर ६१, भोकरदन ७५, घनसावंगी ९४, जाफराबाद ६३, सर्वाधिका मृत्यू हे जालना तालुक्यात झाले असून, त्यांची संख्या ४२० एवढी आहे. मंठा ५२, परतू ७४ आणि अन्य २१० असे एकूण ११८६ बळी गेले आहेत. यामध्ये ७५७ पुरुष तर ४२९ महिलांचा समावेश आहे.