शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

दर्जा मिळाला.. विकासाची प्रतीक्षा कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:05 IST

गेल्या ३७ वर्षाचे अवलोकन केल्यास लातूरच्या तुलनेने जालना विकास आणि सोयी, सुविधा तसेच शिक्षणाच्या बाबतीत कोसोदूर असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्याची निर्मिती होऊन ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. जिल्हा निर्मिती ही सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी मोठा संघर्ष त्या काळातील लोकांनी केला होता, संघर्षानंतर अखेर १ मे १९८१ रोजी जालना जिल्हा निर्मितीची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी केली. अन् जालनेकरांचा आनंद द्विगुणित झाला होता.आता जिल्हा झाल्याने विकासाची पहाट उजाडेल आणि इतर विकसित जिल्ह्यांप्रमाणे जालनाही नावारूपास येईल अशी आशा होती, ती आजही कायम आहे. परंतु गेल्या ३७ वर्षाचे अवलोकन केल्यास लातूरच्या तुलनेने जालना विकास आणि सोयी, सुविधा तसेच शिक्षणाच्या बाबतीत कोसोदूर असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही.जालना जिल्हा निर्मितीसाठी चार दशकापूर्वी ज्यांनी संघर्ष केला होता, त्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे माजी खासदार बाळासाहेब पवार, मोहनलाल गोलेच्छा, बाबूलाल पंडित, मनोहरराव जळगावकर, बळीराम यादव, माणिकचंद बोथरा, रमेशचंद्र चोविश्या, डॉ. शंकरराव राख, शशिकांत पटवारी, अ‍ॅड. भा.गं.देशपांडे, प्रा. भगवान काळे यांच्यासह अन्य अनेक नावे घेता येतील. या सर्वाच्या संघर्षातून औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्याचे विभाजन करून जालना जिल्ह्याची नर्मिती झाली. या निर्मितीमुळे जिल्हा पातळीवरील आवश्यक असणारी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, पोलीस अधीक्षक यासह अन्य महत्वाची कार्यालये येथे आली. त्यामुळे औरंगाबाद आणि परभणी येथे विविध कार्यालयीन कामाकजासाठी होणारी ये-जा थांबली. असे असतानाच आज काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या संस्था,कारखाने वगळता हवा तसा अपेक्षित विकास न झाल्याची खंत आजही जालनेकरांच्या मनात सल करून आहे. लातूर आणि जालन्याची नेहमीच तुलना केली जाते. मात्र लातूरा जे राजकीय नेतृत्व मिळाले तसे नेतृत्व जालन्याला न मिळाल्याचेही दिसून येते. आज लातूर शहराची प्रगती आणि जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालन्याची अवस्था कशी आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. औरंगाबाद नंतर औद्योगिक विकासात जालन्याने भरारी घेतली. मात्र ती केवळ येथील स्थानिक उद्योजकांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे, बियाणे, स्टील, दालमिल, जिनिंग उद्योगामुळे जालन्याचे नाव आज सातासमुद्रापार पोचले आहे. परंंतु त्यात सरकारचा म्हणून वाटा हवा तो नगण्यच आहे. जे काही सहकारी उद्योग होेते, ते आज बंद पडले आहेत. त्यात जालना सहकारी साखर कारखाना, जालना सूतगिरणी, सहकार तत्वावरील सहयोग प्रकल्पाचा समावेश आहे. याच प्रमाणे औद्योगिक वसहातीतील झलानी, त्रिमुर्ती, हिंदूस्तान फेरेडो हे खासगी बडे उद्योगही बंद पडल्याने हजारो कामागांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. आज जे काही उद्योग सुरू आहेत, त्यात बियाणे, स्टील, जिनिंग आणि दाळमिलचा समावेश करता येईल. एनबारबी, विनोदराय इंजिनिअर, एल.जी.बालकृष्णन आदी थोडे बहुत उद्योगांनी त्यांच्या दर्जेदार उत्पादनामुळे निर्यातीत मोठी झेप घेतली आहे. परंतु सरकारच्या प्रयत्नातून गेल्या ३६ वर्षात एकही मोठा उद्योग जिल्ह्यात येऊ शकला नाही. याला अपवाद केवळ माजी खासदार कै. अंकुशराव टोपे म्हणता येतील, त्यांनी समर्थ आणि सागर कारखाना, मत्स्योदरी जिनिंग, मत्स्योदरी शिक्षण संस्था, समर्थ बँक, समर्थ दूग्ध उत्पादन संघ या माध्यमातून जिल्ह्यात सहाकार चवळ रूजविली. हा त्यांचा वसा त्यांचे पुत्र आ. राजेश टोपे तेवढ्याच तन्मयतेने पुढे नेत आहेत. बियाणे क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आणून कै. बद्रीनारायण बारवाले यांनी मोठी क्रांती केली होती.जालना जिल्हा निर्मिती होऊन आता ३७ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे आपण प्रौढ झलो आहोत. त्यामुळे मोठ्यांनी मोठे मन ठेवून जिल्हा व जालना शहराच्या विकासाची धोरणे व अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. शेती, सिंचन, शिक्षण याचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल, यावर मंथन होऊन एक धोरणे ठरले पाहिजे. आज जिल्ह्यात महिलांचे सक्षमीकरण करण्याची जास्त गरज आहे. मुलींचे शाळागळतीचे प्रमाण रोखण्यासाठी आजही मोठे काम करण्याची संधी सत्ताधाºयांना आहे.- आ. राजेश टोपे, घनसावंगीगेल्या ३० वर्षापासून आपण राजकारणात आहोत, मात्र त्यावेळी सत्ता आमच्या पक्षाची नव्हती. आता केंद्र आणि राज्यात आमचे सरकार असल्याने विकासाची गंगा जिल्ह्यात खेखून आणली आहे. भविष्यातही विकास कामांसाठी हवा तेवढा निधी आणणार आहे. आज ड्रायपोर्ट, जालना शहरासह जिल्ह्यातील रस्ते मजबुतीकरणासाठी हजारो कोटी रूपयांचा निधी आणला असून, ड्रायपोर्ट, आयसीटी तसेच सीडस्पार्क च्या माध्यमातून विकास साधण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत.येत्या काही वर्षात याचे सर्व चांगले परिणाम दिसून, विकासाला गती येणार आहे.- खा. रावसाहेब दानवे,भाजपा प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :Jalanaजालनाcivic issueनागरी समस्या