शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाला उत्साहात निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:01 IST

जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. डीजे बंदीमुळे यावेळी हा गणेश उत्सव संस्मरणीय ठरला. पारंपरिक ढोल मंडळ तसेच वाजंत्री आणि बँड पथकाला मोठी मागणी दिसून आली. अनेक मंडळांच्या लेझीम पथकाने लयबध्द सादरीकरण करून जालनेकरांची मने जिंकली. यावेळी काही ठिकाणी बंदी असलेले गाणे वाजविल्यावरून मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बराच वाद झाला.मानाच्या गणपतीची पूजा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी. आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य,यांच्यासह गणेश महासंघाचे अध्यक्ष अग्रवाल, विनित साहनी, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, महावीर ढक्का, मेघराज चौधरी, पारस नंद, नागेश बेनिवाल यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..., गणपती चालले गावाला...चैन..पडेना भक्तांना अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुख्य मिरवणुकीत जवळपास ६२ गाड्या सहभागी झाल्या होत्या. रात्री आठ वाजता सुरू झालेली ही मिरवणूक सकाळी पाच वाजेपर्यंत चालली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुलालांची उधळण आणि ढोल ताशाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. या ढोल पथकात महिला आणि युवतींचाही मोठा सहभाग दिसून आला.नवीन जालना भागाप्रमाणेच जुन्या जालन्यातही अनेक लहानमोठ्या गणेश मंडळांनी सकाळपासूनच वाजतगाजत मिरवणूक काढली होती. मोती तलावा जवळ एन.के. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक गणेश मंडळांना तसेच घरगुती गणेश भक्तांकडून गणपती दत्तक घेतले. तसेच कृत्रिम हौदात गणपतीचे विसर्जन करण्याची विनंती केल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष खरात यांनी दिली.कादराबादेत किरकोळ कारणातून वाद...कादराबाद परिसरात मुख्य मिरवणूक रात्री १ वाजेच्या दरम्यान आली होती. यावेळी दहीहंडी फोडण्यावरून दोन गटात वाद झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. नंतर दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.जुन्या जालन्यातून मोती तलावात गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. या मार्गावरून भविष्यात केवळ एकेरी वाहतूक करणे गरजेचेचे झाले आहे. मोती तलावात विसर्जनाच्यावेळी झालेल्या दुर्घटने नंतर रूग्णवाहिकांना जाण्यासही अडचण आली होती. परंतु गणेश भक्तांनी समयसूचकता दाखवत रूग्णवाहिका जात असताना ढोलताशा बंद ठेवून तातडीने बाजूला होत, मार्ग रिकामा केला होता. परंतु पुढच्या वर्षी या मार्गावरून केवळ एकेरी वाहतूक व्यवस्था करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८