शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

गणरायाला उत्साहात निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:01 IST

जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. डीजे बंदीमुळे यावेळी हा गणेश उत्सव संस्मरणीय ठरला. पारंपरिक ढोल मंडळ तसेच वाजंत्री आणि बँड पथकाला मोठी मागणी दिसून आली. अनेक मंडळांच्या लेझीम पथकाने लयबध्द सादरीकरण करून जालनेकरांची मने जिंकली. यावेळी काही ठिकाणी बंदी असलेले गाणे वाजविल्यावरून मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बराच वाद झाला.मानाच्या गणपतीची पूजा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी. आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य,यांच्यासह गणेश महासंघाचे अध्यक्ष अग्रवाल, विनित साहनी, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, महावीर ढक्का, मेघराज चौधरी, पारस नंद, नागेश बेनिवाल यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..., गणपती चालले गावाला...चैन..पडेना भक्तांना अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुख्य मिरवणुकीत जवळपास ६२ गाड्या सहभागी झाल्या होत्या. रात्री आठ वाजता सुरू झालेली ही मिरवणूक सकाळी पाच वाजेपर्यंत चालली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुलालांची उधळण आणि ढोल ताशाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. या ढोल पथकात महिला आणि युवतींचाही मोठा सहभाग दिसून आला.नवीन जालना भागाप्रमाणेच जुन्या जालन्यातही अनेक लहानमोठ्या गणेश मंडळांनी सकाळपासूनच वाजतगाजत मिरवणूक काढली होती. मोती तलावा जवळ एन.के. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक गणेश मंडळांना तसेच घरगुती गणेश भक्तांकडून गणपती दत्तक घेतले. तसेच कृत्रिम हौदात गणपतीचे विसर्जन करण्याची विनंती केल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष खरात यांनी दिली.कादराबादेत किरकोळ कारणातून वाद...कादराबाद परिसरात मुख्य मिरवणूक रात्री १ वाजेच्या दरम्यान आली होती. यावेळी दहीहंडी फोडण्यावरून दोन गटात वाद झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. नंतर दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.जुन्या जालन्यातून मोती तलावात गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. या मार्गावरून भविष्यात केवळ एकेरी वाहतूक करणे गरजेचेचे झाले आहे. मोती तलावात विसर्जनाच्यावेळी झालेल्या दुर्घटने नंतर रूग्णवाहिकांना जाण्यासही अडचण आली होती. परंतु गणेश भक्तांनी समयसूचकता दाखवत रूग्णवाहिका जात असताना ढोलताशा बंद ठेवून तातडीने बाजूला होत, मार्ग रिकामा केला होता. परंतु पुढच्या वर्षी या मार्गावरून केवळ एकेरी वाहतूक व्यवस्था करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८