शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

'येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी मदत द्या', दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 19:36 IST

तीन तासांत पाच गावांतील पिकांची पाहणी करून केंद्रीय पथक परतले

- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना) : भोकरदन तालुक्यात खरीप हंगामात पडलेल्या दुष्काळी परिस्थिती आढावा व पिकांची पाहणी आज दुपारी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या दोन सदस्यीय पथकाने केली. केवळ तीन तासात पाच गावातील दुष्काळी परिस्थिती, पिकांची पाहणीचा पंचनामा करून पथक परतले. येणाऱ्या खरीप हंगापूर्वी मदत द्यावी अशी मागणी यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पथकाकडे केली.

कृषी मंत्रालयातील ए. एल. वाघमारे आणि हरीश उंबरजे यांच्या पथकाने सुरवातीला दानापूर येथील कोरड्या पडलेल्या जुई मध्यम प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर पंढरपूरवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब वाघ यांच्या शेतावर जाऊन पथकाने कापूस लागवड , त्यासाठी आलेला खर्च आणि उत्पादन याची माहिती घेतली. दिड एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या क्षेत्रातून केवळ एक क्विंटल कापसाचे उत्पादन निघाले, अशी माहिती शेतकरी वाघ यांनी दिली. त्यानंतर  हसनाबाद, फुलेंनगर, येथील कापूस पिकाची तर पिप्री येथे मका व सोयाबीन पिकाची पाहणी पथकाने केली. सर्व ठिकाणी पंचनामे करून हे पथक सायंकाळी साडेपाच वाजता परतले. 

पथकसोबत सोबत अप्पर जिल्हाधिकारी रिना मैत्रावार, जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार संतोष बनकर, व्ही डी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर,शेतकरी केशव जंजाळ, दत्ता पवार, रामराव दळवी, भाऊसाहेब वाघ, अनिल शिंदे, संजय पांडे, लखन पवार आदींची उपस्थिती होती. 

गाळ काढण्यास मदत करावी केशव जंजाळ या शेतकऱ्याने पथकाला दानापूर येथील जुई धरणातील गाळ काढणे व तो शेतात नेऊन टाकण्यासाठी शासनाने मदत करावी. तसेच सध्या निर्माण झालेल्या पाणी टंचाईसाठी तात्काळ टॅंकर मंजूर करावे, जनावरांच्या पाण्याचा सुद्धा विचार करावा, दुष्काळी मदत तात्काळ द्यावी अशी मागणी केली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीJalanaजालना