शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

'येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी मदत द्या', दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 19:36 IST

तीन तासांत पाच गावांतील पिकांची पाहणी करून केंद्रीय पथक परतले

- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना) : भोकरदन तालुक्यात खरीप हंगामात पडलेल्या दुष्काळी परिस्थिती आढावा व पिकांची पाहणी आज दुपारी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या दोन सदस्यीय पथकाने केली. केवळ तीन तासात पाच गावातील दुष्काळी परिस्थिती, पिकांची पाहणीचा पंचनामा करून पथक परतले. येणाऱ्या खरीप हंगापूर्वी मदत द्यावी अशी मागणी यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पथकाकडे केली.

कृषी मंत्रालयातील ए. एल. वाघमारे आणि हरीश उंबरजे यांच्या पथकाने सुरवातीला दानापूर येथील कोरड्या पडलेल्या जुई मध्यम प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर पंढरपूरवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब वाघ यांच्या शेतावर जाऊन पथकाने कापूस लागवड , त्यासाठी आलेला खर्च आणि उत्पादन याची माहिती घेतली. दिड एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या क्षेत्रातून केवळ एक क्विंटल कापसाचे उत्पादन निघाले, अशी माहिती शेतकरी वाघ यांनी दिली. त्यानंतर  हसनाबाद, फुलेंनगर, येथील कापूस पिकाची तर पिप्री येथे मका व सोयाबीन पिकाची पाहणी पथकाने केली. सर्व ठिकाणी पंचनामे करून हे पथक सायंकाळी साडेपाच वाजता परतले. 

पथकसोबत सोबत अप्पर जिल्हाधिकारी रिना मैत्रावार, जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार संतोष बनकर, व्ही डी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर,शेतकरी केशव जंजाळ, दत्ता पवार, रामराव दळवी, भाऊसाहेब वाघ, अनिल शिंदे, संजय पांडे, लखन पवार आदींची उपस्थिती होती. 

गाळ काढण्यास मदत करावी केशव जंजाळ या शेतकऱ्याने पथकाला दानापूर येथील जुई धरणातील गाळ काढणे व तो शेतात नेऊन टाकण्यासाठी शासनाने मदत करावी. तसेच सध्या निर्माण झालेल्या पाणी टंचाईसाठी तात्काळ टॅंकर मंजूर करावे, जनावरांच्या पाण्याचा सुद्धा विचार करावा, दुष्काळी मदत तात्काळ द्यावी अशी मागणी केली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीJalanaजालना