शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी तुडुंब; पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:08 IST

जालना शहराची तहान भागविणारा घाणेवाडी तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराची तहान भागविणारा घाणेवाडी तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. रविवारी रात्री उशिरा हा तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने जालनेकरांना किमान एक वर्ष तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.जालना शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर या तलावाची उभारणी ही निजामकाळात झाली आहे. साधारणपणे १९३२ मध्ये या तलावाचे काम पूर्ण झाले होते. हा तलाव बांधताना जालना शहराची भौगोलिक रचना लक्षात घेऊन तो बांधण्यात आला आहे. त्यामुळे या तलावातून जालन्यातील जेईएस महाविद्यालय जवळ असलेल्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत गुरुत्वबलाने पाणी पाईप लाईनव्दारे येते. वीजेचा मोठा खर्च यामुळे वाचतो.संपूर्ण पावसाळ्यात या तलावात थेंबही नव्हता. परंतु २१ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने या तलावाच्या कॅचमेंट एरियात भरपूर हजेरी लावल्याने तलावात हळूहळू पाणी येत गेले. रविवारी मध्यरात्री या तलावातील पाणी पातळी ही साडे अठरा फुटांवर पोहोचल्याने तो सकाळी ओव्हरफ्लो झाल्याचे सांगण्यात आले.जालना शहराला आज जरी जायकवाडी येथून पाणीपुरवठा होत असला तरी, घाणेवाडी जलाशयातून संपूर्ण नवीन जालना क्षेत्राला पाणीपुरवठा करणे शक्य होते. यामूळे पालिकेची किमान एक वर्षाचा त्रास कमी झाला असून, नागरिकांना या पाण्याचे नीट नियोजन केल्यास टंचाई जाणवणार नाही. हा तलाव भरल्याने त्याच्या खाली असलेले जवळपास पाच बंधारे देखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी