शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी तुडुंब; पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:08 IST

जालना शहराची तहान भागविणारा घाणेवाडी तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराची तहान भागविणारा घाणेवाडी तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. रविवारी रात्री उशिरा हा तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने जालनेकरांना किमान एक वर्ष तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.जालना शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर या तलावाची उभारणी ही निजामकाळात झाली आहे. साधारणपणे १९३२ मध्ये या तलावाचे काम पूर्ण झाले होते. हा तलाव बांधताना जालना शहराची भौगोलिक रचना लक्षात घेऊन तो बांधण्यात आला आहे. त्यामुळे या तलावातून जालन्यातील जेईएस महाविद्यालय जवळ असलेल्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत गुरुत्वबलाने पाणी पाईप लाईनव्दारे येते. वीजेचा मोठा खर्च यामुळे वाचतो.संपूर्ण पावसाळ्यात या तलावात थेंबही नव्हता. परंतु २१ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने या तलावाच्या कॅचमेंट एरियात भरपूर हजेरी लावल्याने तलावात हळूहळू पाणी येत गेले. रविवारी मध्यरात्री या तलावातील पाणी पातळी ही साडे अठरा फुटांवर पोहोचल्याने तो सकाळी ओव्हरफ्लो झाल्याचे सांगण्यात आले.जालना शहराला आज जरी जायकवाडी येथून पाणीपुरवठा होत असला तरी, घाणेवाडी जलाशयातून संपूर्ण नवीन जालना क्षेत्राला पाणीपुरवठा करणे शक्य होते. यामूळे पालिकेची किमान एक वर्षाचा त्रास कमी झाला असून, नागरिकांना या पाण्याचे नीट नियोजन केल्यास टंचाई जाणवणार नाही. हा तलाव भरल्याने त्याच्या खाली असलेले जवळपास पाच बंधारे देखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी