शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी तुडुंब; पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:08 IST

जालना शहराची तहान भागविणारा घाणेवाडी तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराची तहान भागविणारा घाणेवाडी तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. रविवारी रात्री उशिरा हा तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने जालनेकरांना किमान एक वर्ष तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.जालना शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर या तलावाची उभारणी ही निजामकाळात झाली आहे. साधारणपणे १९३२ मध्ये या तलावाचे काम पूर्ण झाले होते. हा तलाव बांधताना जालना शहराची भौगोलिक रचना लक्षात घेऊन तो बांधण्यात आला आहे. त्यामुळे या तलावातून जालन्यातील जेईएस महाविद्यालय जवळ असलेल्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत गुरुत्वबलाने पाणी पाईप लाईनव्दारे येते. वीजेचा मोठा खर्च यामुळे वाचतो.संपूर्ण पावसाळ्यात या तलावात थेंबही नव्हता. परंतु २१ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने या तलावाच्या कॅचमेंट एरियात भरपूर हजेरी लावल्याने तलावात हळूहळू पाणी येत गेले. रविवारी मध्यरात्री या तलावातील पाणी पातळी ही साडे अठरा फुटांवर पोहोचल्याने तो सकाळी ओव्हरफ्लो झाल्याचे सांगण्यात आले.जालना शहराला आज जरी जायकवाडी येथून पाणीपुरवठा होत असला तरी, घाणेवाडी जलाशयातून संपूर्ण नवीन जालना क्षेत्राला पाणीपुरवठा करणे शक्य होते. यामूळे पालिकेची किमान एक वर्षाचा त्रास कमी झाला असून, नागरिकांना या पाण्याचे नीट नियोजन केल्यास टंचाई जाणवणार नाही. हा तलाव भरल्याने त्याच्या खाली असलेले जवळपास पाच बंधारे देखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी