शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

काँग्रेसचे ‘गेट टूगेदर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:49 AM

आपापसातील मतभेद आणि दुरावलेली मने पुन्हा जुळविण्यासाठी काँग्रेसने ‘गेट टूगेदर’ द्वारे पक्षात नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा, राज्य आणि देशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. आपापसातील मतभेद आणि दुरावलेली मने पुन्हा जुळविण्यासाठी काँग्रेसने ‘गेट टूगेदर’ द्वारे पक्षात नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाला अधिक सक्षम करुन आगामी काळात याचे चांगले परिणाम दिसून येतील, असा दावा काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिका-यांनी केला आहे.मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजप, शिवसेनेची सरशी झाली आणि राज्यासह देशात सत्ता स्थापन करण्यात आली. या सत्तेत जिल्ह्याला महत्त्वाचा वाटा देण्यात आलेला आहे. एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद अशी शासकीय आणि राजकीयदृष्ट्या वजनदार पदे जिल्ह्याला लाभली आहेत. त्यातच गत तीन वर्षांपासून जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरु असून, शेकडो कोटी रुपये खर्चांची कामे केली जात आहेत. तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी, अशी अवस्था झाली आहे. आपल्याला डावलले जात असल्याची ज्येष्ठ पदाधिका-यांची भावना होत आहे. तर तरुणांना संधी दिली जात नसल्याने त्यांच्यात मरगळ आली आहे. एके काळी जिल्ह्यात सर्वात प्रबळ पक्ष असलेल्या काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. विविध विषयांवर आंदोलन छेडून सत्ताधाºयांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष मागे असल्याचे दिसून येत आहे. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी पुढाकार घेत हुरडा पार्टीच्या निमित्ताने घेतलेल्या ‘गेट टूगेदर’ कार्यक्रमात ज्येष्ठ आणि तरुण पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांना एकत्र आणले. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष उभारणीत आणि जनमाणसात पक्षाचे स्थान निर्माण करण्यात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ नेते फुलचंद भक्कड, माजी मंत्री शंकरराव राख, रामप्रसाद कुलवंत, माजी आ. संतोषराव दसपुते, बाबूराव कुलकर्णी, ज्ञानेश्वर भांदरगे, नवाब डांगे, आर.आर. खडके, ज्ञानदेव पायगव्हाणे यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी ज्यांनी काँग्रेस उभारणी आपले मोलाचे योगदान दिले आहे. अशी सर्वांनी या गेट टूगेदर कार्यक्रमास उपस्थिती लावली आणि आपली मने मोकळी केली. तसेच चर्चा करुन पुढील पक्ष कार्याची दिशा बोलून दाखविली. तर जिल्ह्यात महिला आघाडीसह अल्पसंख्याक व इतर विविध सेलच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या, युवक काँग्रेसच्या शाखा , वॉर्ड कमिट्या स्थापन करून पक्ष अधिक सक्षम केला जाणार आहे. यादृष्टिने आगामी दिवसांत दर महिन्याला जिल्हा कमिटीची प्रत्येकी एका तालुक्यात बैठक घेतली जाईल. यात जुन्या जाणत्या नेत्यांना विश्वासात घेऊन नवीन कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.