शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

चोरावर मोर ! फसवणूक करणाऱ्याचे बेरोजगार तरुणांनी केले अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 17:51 IST

Kidnapping at Jalana सातारा येथील तरुणांना नोकरीचे आमिष देऊन फसवल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देसातारा येथील तरुणांची नोकरीचे आमिष देऊन केली होती फसवणूक जालना येथील बसस्थानकातून केले तरुणाचे अपहरण

जालना : नोकरीचे आमिष दाखवून तरूणांना लाखो रूपयांना लुटणाऱ्याचे अपहरण करून त्याला सातारा येथे घेवून गेलेल्या नऊ जणांना सदर बाजार पोलिसांनी शुक्रवारी अटक  केली.  वैभव भैरू पाटील (वय २१. रा. तिरपण्या जि. कोल्हापूर), सतीश गराडे (वय २३ रा. आमनेवाडी जि. कोल्हापूर), प्रशांत संभाजी पवार (वय २९ रा. करंजोशी जि. कोल्हापूर), पुष्पराज मारोती जाधव (२६ रा. युलुर जि. सांगली), वैभव भास्कर शेशवारे  (३५. रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), मनोहर भास्कर शेशवारे (४२ रा. अगरण धुळगाव जि. सांगली), नितीन बाळू दाढे (२३, रा. वाफळे जि. सोलापूर), गणेश पांडुरंग दाढे (२९, रा. वाफळे जि. सोलापूर), शरद बाळू दाढे (२५ रा. वाफळे, जि. सोलापूर) असे संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली.  

विठ्ठल विजयसिंग जारवाल (रा. राजेवाडी ता. बदनापूर) हा  १४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी साडेअकर वाजता आपल्या मित्रासोबत जालना येथील बसस्थानकात उभा होता. तेव्हाच नऊ जणांनी त्याला मारहाण करून गाडीत बसवले. त्यानंतर त्याला आरोपी गाडीत घेऊन गेले. या प्रकरणी तरूणाच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासून गाडीचा क्रमांक काढला. अपहरणकर्ते अंबड, पैठण, शेगाव मार्गे जात असल्याची माहिती मिळाल्याने सातारा कोल्हापूरकडे पथके रवाना करण्यात आली होती. पोनि. देशमुख यांनी अहमदनगर, सातारा, कोल्हापूर येथील नियंत्रण कक्षास कळविले होते. सातारा पोलिसांनी संबंधित युवकांचे फोन नंबर ट्रेस करून अपहरण झालेल्या युवकाची सुटका केली. यावेळी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय देशमुख, कर्मचारी कैलास खार्डे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे यांनी केली.

नोकरीचे आमिष देऊन केली फसवणूक दरम्यान, विठ्ठल जारवाल याने सातारा येथील तरुणांना नोकरीचे आमिष देऊन फसवल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी विठ्ठल सातारा येथे गेला असता त्याने आपली मंत्र्यांसोबत ओळख असल्याची बतावणी करून तरुणांना नोकरीचे आमिष दिले. बेरोजगार तरुणांनी आमिषाला बळी पडत त्याला रोख रक्कम दिली. बरेच दिवस झाले तरी नोकरीबद्दल काहीच हाती लागत नसल्याने तरुणांनी विठ्ठलकडे पैस्यांची मागणी केली. त्याने चालढकल केल्याने संतप्त तरुणांनी जालन्यात येऊन विठ्ठलचे अपहरण केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणJalanaजालना