शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चोरावर मोर ! फसवणूक करणाऱ्याचे बेरोजगार तरुणांनी केले अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 17:51 IST

Kidnapping at Jalana सातारा येथील तरुणांना नोकरीचे आमिष देऊन फसवल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देसातारा येथील तरुणांची नोकरीचे आमिष देऊन केली होती फसवणूक जालना येथील बसस्थानकातून केले तरुणाचे अपहरण

जालना : नोकरीचे आमिष दाखवून तरूणांना लाखो रूपयांना लुटणाऱ्याचे अपहरण करून त्याला सातारा येथे घेवून गेलेल्या नऊ जणांना सदर बाजार पोलिसांनी शुक्रवारी अटक  केली.  वैभव भैरू पाटील (वय २१. रा. तिरपण्या जि. कोल्हापूर), सतीश गराडे (वय २३ रा. आमनेवाडी जि. कोल्हापूर), प्रशांत संभाजी पवार (वय २९ रा. करंजोशी जि. कोल्हापूर), पुष्पराज मारोती जाधव (२६ रा. युलुर जि. सांगली), वैभव भास्कर शेशवारे  (३५. रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), मनोहर भास्कर शेशवारे (४२ रा. अगरण धुळगाव जि. सांगली), नितीन बाळू दाढे (२३, रा. वाफळे जि. सोलापूर), गणेश पांडुरंग दाढे (२९, रा. वाफळे जि. सोलापूर), शरद बाळू दाढे (२५ रा. वाफळे, जि. सोलापूर) असे संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली.  

विठ्ठल विजयसिंग जारवाल (रा. राजेवाडी ता. बदनापूर) हा  १४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी साडेअकर वाजता आपल्या मित्रासोबत जालना येथील बसस्थानकात उभा होता. तेव्हाच नऊ जणांनी त्याला मारहाण करून गाडीत बसवले. त्यानंतर त्याला आरोपी गाडीत घेऊन गेले. या प्रकरणी तरूणाच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासून गाडीचा क्रमांक काढला. अपहरणकर्ते अंबड, पैठण, शेगाव मार्गे जात असल्याची माहिती मिळाल्याने सातारा कोल्हापूरकडे पथके रवाना करण्यात आली होती. पोनि. देशमुख यांनी अहमदनगर, सातारा, कोल्हापूर येथील नियंत्रण कक्षास कळविले होते. सातारा पोलिसांनी संबंधित युवकांचे फोन नंबर ट्रेस करून अपहरण झालेल्या युवकाची सुटका केली. यावेळी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संजय देशमुख, कर्मचारी कैलास खार्डे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे यांनी केली.

नोकरीचे आमिष देऊन केली फसवणूक दरम्यान, विठ्ठल जारवाल याने सातारा येथील तरुणांना नोकरीचे आमिष देऊन फसवल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी विठ्ठल सातारा येथे गेला असता त्याने आपली मंत्र्यांसोबत ओळख असल्याची बतावणी करून तरुणांना नोकरीचे आमिष दिले. बेरोजगार तरुणांनी आमिषाला बळी पडत त्याला रोख रक्कम दिली. बरेच दिवस झाले तरी नोकरीबद्दल काहीच हाती लागत नसल्याने तरुणांनी विठ्ठलकडे पैस्यांची मागणी केली. त्याने चालढकल केल्याने संतप्त तरुणांनी जालन्यात येऊन विठ्ठलचे अपहरण केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणJalanaजालना