शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

शेतकऱ्यांची करोडोची फसवणूक; ज्यादा पैसे देतो म्हणत उधारीवर शेतमाल घेऊन व्यापारी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 13:07 IST

पैसा न मिळाल्याने यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना दुसरीकडे हात पसरावे लागले. काही शेतकऱ्यांच्या घरात देखील यावरून वाद सुरू झाले आहेत.

भोकरदन( जालना) : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका भुसार मालाच्या स्थानिक व्यापाऱ्याने शेकडो शेतकऱ्यांची जादा भावाचे आमिष दाखवीत करोडोंची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांकडून  उधारीवर घेतलेला सोयाबीन, मका, हरबरा, कापूस असा कोट्यवधी रुपयांचा माल घेऊन व्यापारी फरार झाला असून याप्रकरणी पारध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश रामकिशन बालरावत ( रा.पिंपळगाव रेणुकाई) असे फरार व्यापाऱ्याचे नाव आहे. 

तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील व्यापारी दिनेश बलरावत याचे वडील व दोन भाऊ मागील अनेक वर्षापासून गावात भुसारचा व्यवसाय करतात. गावातील तसेच परिसरातील शेतकरी त्यांच्याकडे आपला शेतीमाल विकण्यासाठी जायचे. दिनेश शेतकऱ्यांना जादा भावाचे आमिष देत बिलाच्या कच्चा पावत्या बनवून देत शेतमाल खरेदी करत असे. त्यानंतर काही दिवसांनी ठरल्यानुसार पैसे द्यायचा. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. 

दरम्यान, यावर्षी देखील शेतकऱ्यांनी दिनेशला सोयाबीन, कापुस, मका, हरभरा आदी माल मुदतीवर विकला. पंरतु, मुदत संपवून देखील शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही. काही शेतकरी घरी गेल्यावर त्याच्या परिवाराकडून धमक्या देत उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. मागील तीन ते चार महिन्यापासून दिनेश बलरावत हा गावातून गायब, त्याचा मोबाईल देखील बंद येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पैसा न मिळाल्याने यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना दुसरीकडे हात पसरावे लागले. काही शेतकऱ्यांच्या घरात देखील यावरून वाद सुरू झाले. अनेक शेतकरी मानसिक तणावात आहेत. 

अखेर याप्रकरणी संतोष उल्हासराव देशमुख, संतोष गणेशराव देशमुख, संदीप सुभाषराव देशमुख, रामेश्वर विठ्ठलराव देशमुख, विठ्ठल गणेशराव देशमुख यांनी पारध पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रार दिली. यावरून  व्यापारी दिनेशवर  ४२०, ४०६ कलम अन्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांची जवळपास २५ लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. फसवणूक झालेले अन्य शेकडो शेतकरी देखील दिनेश बलरावत विरोधात पारध पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार देणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश रुपेकर हे करीत आहेत.

शेतकऱ्यांनी जागरुक राहून व्यवहार करावा. खबरदारीने शेतमाला संदर्भात निर्णय घ्यावेत. आरोपीला कडक शासन होईल यासाठी. - अभिजीत मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पारध पोलीस स्टेशन.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना