शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची करोडोची फसवणूक; ज्यादा पैसे देतो म्हणत उधारीवर शेतमाल घेऊन व्यापारी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 13:07 IST

पैसा न मिळाल्याने यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना दुसरीकडे हात पसरावे लागले. काही शेतकऱ्यांच्या घरात देखील यावरून वाद सुरू झाले आहेत.

भोकरदन( जालना) : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका भुसार मालाच्या स्थानिक व्यापाऱ्याने शेकडो शेतकऱ्यांची जादा भावाचे आमिष दाखवीत करोडोंची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांकडून  उधारीवर घेतलेला सोयाबीन, मका, हरबरा, कापूस असा कोट्यवधी रुपयांचा माल घेऊन व्यापारी फरार झाला असून याप्रकरणी पारध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश रामकिशन बालरावत ( रा.पिंपळगाव रेणुकाई) असे फरार व्यापाऱ्याचे नाव आहे. 

तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील व्यापारी दिनेश बलरावत याचे वडील व दोन भाऊ मागील अनेक वर्षापासून गावात भुसारचा व्यवसाय करतात. गावातील तसेच परिसरातील शेतकरी त्यांच्याकडे आपला शेतीमाल विकण्यासाठी जायचे. दिनेश शेतकऱ्यांना जादा भावाचे आमिष देत बिलाच्या कच्चा पावत्या बनवून देत शेतमाल खरेदी करत असे. त्यानंतर काही दिवसांनी ठरल्यानुसार पैसे द्यायचा. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. 

दरम्यान, यावर्षी देखील शेतकऱ्यांनी दिनेशला सोयाबीन, कापुस, मका, हरभरा आदी माल मुदतीवर विकला. पंरतु, मुदत संपवून देखील शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही. काही शेतकरी घरी गेल्यावर त्याच्या परिवाराकडून धमक्या देत उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. मागील तीन ते चार महिन्यापासून दिनेश बलरावत हा गावातून गायब, त्याचा मोबाईल देखील बंद येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पैसा न मिळाल्याने यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना दुसरीकडे हात पसरावे लागले. काही शेतकऱ्यांच्या घरात देखील यावरून वाद सुरू झाले. अनेक शेतकरी मानसिक तणावात आहेत. 

अखेर याप्रकरणी संतोष उल्हासराव देशमुख, संतोष गणेशराव देशमुख, संदीप सुभाषराव देशमुख, रामेश्वर विठ्ठलराव देशमुख, विठ्ठल गणेशराव देशमुख यांनी पारध पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रार दिली. यावरून  व्यापारी दिनेशवर  ४२०, ४०६ कलम अन्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांची जवळपास २५ लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. फसवणूक झालेले अन्य शेकडो शेतकरी देखील दिनेश बलरावत विरोधात पारध पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार देणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश रुपेकर हे करीत आहेत.

शेतकऱ्यांनी जागरुक राहून व्यवहार करावा. खबरदारीने शेतमाला संदर्भात निर्णय घ्यावेत. आरोपीला कडक शासन होईल यासाठी. - अभिजीत मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पारध पोलीस स्टेशन.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना