एकेरी वाहतुकीच्या वळणावर चार जणांना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST2021-02-15T04:27:08+5:302021-02-15T04:27:08+5:30
औरंगाबाद येथून फंदाळे परिरवार हे मंगळवारी होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी सर्व ती तयारी करून वाशिमकडे जात होते. परंतु रविवारची सकाळ ...

एकेरी वाहतुकीच्या वळणावर चार जणांना जलसमाधी
औरंगाबाद येथून फंदाळे परिरवार हे मंगळवारी होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी सर्व ती तयारी करून वाशिमकडे जात होते. परंतु रविवारची सकाळ त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरली असेच म्हणावे लागेल. पत्नी, दोन चिमकुल्या मुलीसह १७ वर्षांच्या मामेभावासोबत गोपाळ फांदळे हे जात होते. परंतु मध्येच काळाने त्यांच्या पत्नी आणि मुलीवर घाला घातल्याने ते भावुक झाले होते. अपघातातून वाचलेले गोपाळ फांदळे हे उपचारा नंतर मुलगी आणि नातेवाइकासोबत औरंगाबादला रवाना झाल्याचे नातेवाईक हर्षद ठाकरे यांनी सांगितले.
हंबरडा फोडल्याने वातावरण गंभीर
सदरील अपघाताची माहिती औरंगाबादला कळताच गोपाळ फांदळे यांचे नातेवाईक आणि मित्र हर्षद ठाकरे, सिचन कापसे आणि अतुल वेताळ हे अपघात स्थळी दाखल झाले. माही आईसह विहिरीत बुडाल्याची माहिती हर्षदला कळताच त्याने हंबरडा फोडला. त्यामुळे वातावरण भावूक झाले हेाते. हुंदका आवरत असतांना माहीबद्दल सांगताना तो म्हणाला की, माही दररोज मला चॉकलेट आणायला सांगत, परंतु ते न दिल्यास ती हट्ट धरून बसायची. अशी आठवण सांगितली.
संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
शुक्रवारचा अपघात ताजा असतानाच रविवारी पुन्हा तेथेच आणि तसाच अपघात झाला. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यावेळी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून रखडलल्या रस्त्याच्या कंत्राटदारासह अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.
पोलिसांची कसरत
सलग अपघांमुळे अग्निशमन दल तसेच तालुका पोलीस ठाणे, महामार्ग ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन्ही अपघातात मोठे परिश्रम घेतले. अपघातानंतर संतप्त जमावाला शांत करण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी मध्यस्ती केली.