मासेगाव येथून चार जनावरे चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST2021-08-21T04:35:00+5:302021-08-21T04:35:00+5:30
संस्कार प्रबोधनीचे परीक्षेत यश जालना : एनएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात संस्कार प्रबोधनी शाळेच्या ११ ...

मासेगाव येथून चार जनावरे चोरीस
संस्कार प्रबोधनीचे परीक्षेत यश
जालना : एनएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात संस्कार प्रबोधनी शाळेच्या ११ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यात वैभव शेवाळे, दीपाली मोडे, ऋषिका गोराडे, यशराज नन्नवरे, आदित्य सरडे, नरहरी नन्नवरे, योगिता देशपांडे, अनुष्का ढाकणे, आदिती मुळे, मयुरी कोठी आणि भाग्यश्री काटकर यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक भागवत मराठे, बाळासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
शहरात कोरोना वीरांचा सत्कार
जालना : येथील घायाळ नगरमधील लोकमान्य विद्यालयात कोरोना वीरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शेषराव खरात यांनी शाल -श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन शाळेतील शिक्षक नारायण भुजंग, अरविंद रंगारी, सुरेश घायाळ, संदीप राठोड, मनोहर सोनार आदींचा सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष त्रिंबक जाधव, सहसचिव गजानन भवर, कोषाध्यक्ष भाऊराव चव्हाण, संस्थापक अध्यक्ष तथा संचालक साहेबराव ढवळे, शालेय समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ वाघमारे आदींची उपस्थिती होती.
वाचनालयास ५ हजार रुपयांची मदत
जालना : रेवगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान वाढीस वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या वाचनालयास शीला जैस्वाल यांनी ५ हजार १०१ रुपयांची पुस्तके खरेदीसाठी मदत दिली आहे. कार्यक्रमास सरपंच वैशाली चव्हाण, उपसरपंच अनिता कदम, छाया बन, प्रभावती कंबळू, सुभद्रा शेळके आदींची उपस्थिती होती.
त्या शिक्षकाचे निलंबन रद्द
जालना : दाभाडी येथील शिवाजी विद्यालयात कार्यरत असलेले विलास रामचंद्र इंगळे यांचे शिस्तभंगाच्या मुद्द्यावरून निलंबन करण्यात आले होते. तसा अहवाल शिवाजी विद्यालयाच्या व्यवस्थापनाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिला होता; परंतु आता इंगळे यांनी यात आपली बाजू मांडल्यानंतर त्यांचे निलंबन शिक्षणाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे.
पूरग्रस्तांसाठी विद्यालयातर्फे फेरी
जालना : येथील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने कोकण विभागात आलेल्या पूरग्रस्तांना मदतीसाठी फेरी काढण्यात आली. या फेरीतून जमा झालेला निधी पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे सचिव ब्रह्मानंद चव्हाण, बाबुराव भुतेकर, विजू खरात, अनिल खिल्लारे, प्राचार्य बाबासाहेब गवळी, डॉ. सुवर्णा चव्हाण, डॉ. पी.व्ही. वणजय यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.