शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

साडेचार हजार मजूर मनरेगाच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:40 IST

दुष्काळाच्या झळा भर पावसाळ्यात कायम असून, हाताला काम मिळत नसल्याने ४ हजार ५७४ मजूर मनरेगाच्या कामावर उपस्थित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, जालना जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. परिणामी, दुष्काळाच्या झळा भर पावसाळ्यात कायम असून, हाताला काम मिळत नसल्याने ४ हजार ५७४ मजूर मनरेगाच्या कामावर उपस्थित आहेत.गतवर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पाऊस न आल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांचे स्थलांतर होऊ नये, त्यांच्या हाताला कामे मिळावी, यासाठी शासनाच्या वतीने मनरेगा योजनेंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करुन दिली.यावर्षी चांगला पाऊस पडेल, अशी आशा होती. परंतु, पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत असून, यावर खरीप हंगामाची पिके जगली आहेत. मात्र, मजुरांच्या हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.परिणामी अनेकांनी प्रशासनाने सुरू केलेल्या मनरेगाच्या कामावर जाणे पसंत केले आहे. जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींपैकी १२१ ग्रामपंचायतीमध्ये मनरेगाची विविध प्रकारची ४२७ कामे सुरू आहेत. या कामावर साडेचार हजार मजुरांची उपस्थिती आहे.

टॅग्स :Labourकामगारdroughtदुष्काळgovernment schemeसरकारी योजनाUnemploymentबेरोजगारी