शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

साडेचार हजार मजूर मनरेगाच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:40 IST

दुष्काळाच्या झळा भर पावसाळ्यात कायम असून, हाताला काम मिळत नसल्याने ४ हजार ५७४ मजूर मनरेगाच्या कामावर उपस्थित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, जालना जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. परिणामी, दुष्काळाच्या झळा भर पावसाळ्यात कायम असून, हाताला काम मिळत नसल्याने ४ हजार ५७४ मजूर मनरेगाच्या कामावर उपस्थित आहेत.गतवर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पाऊस न आल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांचे स्थलांतर होऊ नये, त्यांच्या हाताला कामे मिळावी, यासाठी शासनाच्या वतीने मनरेगा योजनेंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करुन दिली.यावर्षी चांगला पाऊस पडेल, अशी आशा होती. परंतु, पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत असून, यावर खरीप हंगामाची पिके जगली आहेत. मात्र, मजुरांच्या हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.परिणामी अनेकांनी प्रशासनाने सुरू केलेल्या मनरेगाच्या कामावर जाणे पसंत केले आहे. जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींपैकी १२१ ग्रामपंचायतीमध्ये मनरेगाची विविध प्रकारची ४२७ कामे सुरू आहेत. या कामावर साडेचार हजार मजुरांची उपस्थिती आहे.

टॅग्स :Labourकामगारdroughtदुष्काळgovernment schemeसरकारी योजनाUnemploymentबेरोजगारी