शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

साडेचार हजार मजूर मनरेगाच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:40 IST

दुष्काळाच्या झळा भर पावसाळ्यात कायम असून, हाताला काम मिळत नसल्याने ४ हजार ५७४ मजूर मनरेगाच्या कामावर उपस्थित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, जालना जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. परिणामी, दुष्काळाच्या झळा भर पावसाळ्यात कायम असून, हाताला काम मिळत नसल्याने ४ हजार ५७४ मजूर मनरेगाच्या कामावर उपस्थित आहेत.गतवर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पाऊस न आल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांचे स्थलांतर होऊ नये, त्यांच्या हाताला कामे मिळावी, यासाठी शासनाच्या वतीने मनरेगा योजनेंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करुन दिली.यावर्षी चांगला पाऊस पडेल, अशी आशा होती. परंतु, पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत असून, यावर खरीप हंगामाची पिके जगली आहेत. मात्र, मजुरांच्या हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.परिणामी अनेकांनी प्रशासनाने सुरू केलेल्या मनरेगाच्या कामावर जाणे पसंत केले आहे. जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींपैकी १२१ ग्रामपंचायतीमध्ये मनरेगाची विविध प्रकारची ४२७ कामे सुरू आहेत. या कामावर साडेचार हजार मजुरांची उपस्थिती आहे.

टॅग्स :Labourकामगारdroughtदुष्काळgovernment schemeसरकारी योजनाUnemploymentबेरोजगारी