शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

अवैध नळजोडण्या नियमित करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:47 AM

शहरातील अवैध नळ जोडण्या शोधून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीचा रेटा तसेच महसूल वाढीच्या दृष्टिने अधिकृत नळ जोडणीची संख्या वाढविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून अवैध जोडणी नियमित करण्यावर भर दिला जात आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील अवैध नळ जोडण्या शोधून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीचा रेटा तसेच महसूल वाढीच्या दृष्टिने अधिकृत नळ जोडणीची संख्या वाढविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून अवैध जोडणी नियमित करण्यावर भर दिला जात आहे.शहरातील विविध भागांत असलेल्या अवैध नळ जोडण्या हा पालिकेसाठी अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरत आहे. त्यातच एकाच घरात दोन दोन नळजोडण्या असून, अनेकवेळा याविरोधात पालिका प्रशासनाकडून मोहीमही उघडण्यात आली पण स्थानिक राजकीय नेत्यांच्या दबावामुळे याला यश येऊ शकलेले नाही. त्यातच पालिकेचे उत्पन्न बुडत असल्याने मुलभूत सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. यावर तोडगा काढत पालिकेने अवैध नळजोडण्या दंड आकारुन वैध करण्यावर भर देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पालिकेच्या पथकाकडून दोन महिन्यांत ४०० पेक्षा अधिक जोडण्या अधिकृत करण्यात आल्या असल्या तरी भविष्यात पाणी कर किती नागरिक भरतात यावर या मोहिमेचे यश अवलंबून आहे. वैध नळजोडण्यांपेक्षा अवैध नळजोडण्यांची संख्या तब्बल तिप्पट असल्याचे मालमत्तांच्या संख्येवरुन दिसून येते.नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे एकूण ४४ हजार मालमत्तांची नोंद असून, नवीन मुल्यांकनानुसार सुमारे २५ हजारांवर मालमत्तांची वाढ झाली आहे. असे असताना वैध नळ जोडण्यांची संख्या अत्यंत कमी आहे. पाणीपुरवठा विभागाकडे १८ हजार आणि मालमत्ता विभागाकडे सुमारे २२ हजार नळ जोडण्या असल्याची नोंद आहे. शहरातील बहुतांश भागांत अवैध नळ जोडण्या मोठ्या प्रमाणात आहे. कन्हैय्यानगर, लोधीमोहल्ला, दुखीनगर, सुंदरनगर, चंदनझिरा, शेरसवारनगर, शंकरनगर, लालबाग, गांधीनगर या भागात अवैध नळ जोडण्यांची प्रमाण अधिक आहे. काहींनी घरगुती वापराबरोबरच व्यावसायिक कामांसाठी चक्क मुख्य जलवाहिनीवर अवैध नळ जोडण्यात घेतल्याचे तपासणीत समोर आले आहे. अंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू झाल्यानंतर अवैध नळ जोडण्यांची शोध मोहीम पालिकेने हाती घेतली. यासाठी नवीन जालना व जुना जालना, अशी दोन स्वतंत्रे पथकेही तयार करण्यात आली.मात्र, पथकाने पाणीचोरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याऐवजी दंडात्मक रक्कम व एका वर्षाची पाणीपट्टी आकारुन अवैध जोडण्या नियमित करण्याचे धोरण अवलंबले आहे.मागील दोन महिन्यांत चारशेहून अधिक अवैध जोडण्यात नियिमित करण्यात आल्या असून, सुमारे १४ लाखांची वसुली करण्यात आली आहे. मात्र, एकूण अवैध नळजोडण्यांचा विचार करता ही कासवगतीच असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे वर्षानुवर्षे पाणी चोरी करणाºयांना नाममात्र दंड आकारला जात असल्याने नियमितपणे पाणीपट्टी भरणाºयांवर एक प्रकारे हा अन्यायच असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालना