शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर शेतकऱ्याकडून दहाला पाच; ग्राहकाच्या पदरात दहाला दोन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST

जालना : अवेळी पडणारा पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यात शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी ...

जालना : अवेळी पडणारा पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यात शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी केली जात असली तरी बाजारपेठेत त्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी अडचणींवर मात करीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. उत्पादित भाजीपाला बाजारपेठेत विक्रीस नेण्यास शेतकऱ्यांची सोय होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे भाजीपाला व्यापाऱ्यांना विक्री करतात. शेतकऱ्यांकडून किलोवर, क्रेटवर खरेदी केला जाणारा भाजीपाला हा ग्राहकांना पेंडीवर विक्री केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादित माल पाच रुपयांना दोन पेंडी मिळत असेल तर बाजारपेठेत पाच रुपयांना एक पेंडीप्रमाणे विक्री केला जातो. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आणि शेतकऱ्यांनाही भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळत नाही.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

शेती करताना आज एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व अडचणींवर मात करीत आम्ही भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. परंतु, उत्पादित माल विक्रीसाठी काढल्यानंतर केलेला खर्चही आमच्या हाती पडत नाही.- शेतकरी

वातावरणातील बदल आणि कोरोनामुळे शेती व्यवसायाला फटका बसला आहे. त्यात रोगराईचा सामनाही शेतकऱ्यांना करावा लागतो. विविध अडचणींवर मात करून भाजीपाला उत्पादित केला तर त्याला अपेक्षित दर मिळत नाही. - शेतकरी

ग्राहकांना परवडेना

कोरोनामुळे आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. त्यात खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, किराणाच्या दरात वाढ झाली आहे. त्यात आता दैनंदिन गरजेचा असलेला भाजीपालाही दैनंदिन महागत असल्याचे दिसत आहे. - सूरज सातपुते

शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी केलेला भाजीपाला व्यापारी अधिक दराने विक्री करतात. त्यात दरामध्ये भाजीपाला विक्री करण्यासाठी येणाऱ्यांचे दर बाजारपेठेपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. - कृष्णा फुटाणे

भावात एवढा फरक का?

व्यापाऱ्यांना शेतातील कोथिंबिरीसह भाजीपाला काढण्यासाठी मजुरावर खर्च करावा लागतो. त्याची वाहतूक विविध ठिकाणी करावी लागते. या सर्व बाबींवर खर्च वाढतो. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या दरामध्ये मोठा फरक दिसून येत आहे.