शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

कोथिंबीर शेतकऱ्याकडून दहाला पाच; ग्राहकाच्या पदरात दहाला दोन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST

जालना : अवेळी पडणारा पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यात शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी ...

जालना : अवेळी पडणारा पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यात शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी केली जात असली तरी बाजारपेठेत त्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी अडचणींवर मात करीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. उत्पादित भाजीपाला बाजारपेठेत विक्रीस नेण्यास शेतकऱ्यांची सोय होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे भाजीपाला व्यापाऱ्यांना विक्री करतात. शेतकऱ्यांकडून किलोवर, क्रेटवर खरेदी केला जाणारा भाजीपाला हा ग्राहकांना पेंडीवर विक्री केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादित माल पाच रुपयांना दोन पेंडी मिळत असेल तर बाजारपेठेत पाच रुपयांना एक पेंडीप्रमाणे विक्री केला जातो. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आणि शेतकऱ्यांनाही भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळत नाही.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

शेती करताना आज एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व अडचणींवर मात करीत आम्ही भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. परंतु, उत्पादित माल विक्रीसाठी काढल्यानंतर केलेला खर्चही आमच्या हाती पडत नाही.- शेतकरी

वातावरणातील बदल आणि कोरोनामुळे शेती व्यवसायाला फटका बसला आहे. त्यात रोगराईचा सामनाही शेतकऱ्यांना करावा लागतो. विविध अडचणींवर मात करून भाजीपाला उत्पादित केला तर त्याला अपेक्षित दर मिळत नाही. - शेतकरी

ग्राहकांना परवडेना

कोरोनामुळे आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. त्यात खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, किराणाच्या दरात वाढ झाली आहे. त्यात आता दैनंदिन गरजेचा असलेला भाजीपालाही दैनंदिन महागत असल्याचे दिसत आहे. - सूरज सातपुते

शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी केलेला भाजीपाला व्यापारी अधिक दराने विक्री करतात. त्यात दरामध्ये भाजीपाला विक्री करण्यासाठी येणाऱ्यांचे दर बाजारपेठेपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. - कृष्णा फुटाणे

भावात एवढा फरक का?

व्यापाऱ्यांना शेतातील कोथिंबिरीसह भाजीपाला काढण्यासाठी मजुरावर खर्च करावा लागतो. त्याची वाहतूक विविध ठिकाणी करावी लागते. या सर्व बाबींवर खर्च वाढतो. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या दरामध्ये मोठा फरक दिसून येत आहे.