शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
4
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
5
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
6
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
7
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
8
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
9
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
10
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
11
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
12
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
13
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
14
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
15
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
16
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
17
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
18
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
19
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
20
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर शेतकऱ्याकडून दहाला पाच; ग्राहकाच्या पदरात दहाला दोन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST

जालना : अवेळी पडणारा पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यात शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी ...

जालना : अवेळी पडणारा पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यात शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी केली जात असली तरी बाजारपेठेत त्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी अडचणींवर मात करीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. उत्पादित भाजीपाला बाजारपेठेत विक्रीस नेण्यास शेतकऱ्यांची सोय होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे भाजीपाला व्यापाऱ्यांना विक्री करतात. शेतकऱ्यांकडून किलोवर, क्रेटवर खरेदी केला जाणारा भाजीपाला हा ग्राहकांना पेंडीवर विक्री केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादित माल पाच रुपयांना दोन पेंडी मिळत असेल तर बाजारपेठेत पाच रुपयांना एक पेंडीप्रमाणे विक्री केला जातो. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आणि शेतकऱ्यांनाही भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळत नाही.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

शेती करताना आज एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व अडचणींवर मात करीत आम्ही भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. परंतु, उत्पादित माल विक्रीसाठी काढल्यानंतर केलेला खर्चही आमच्या हाती पडत नाही.- शेतकरी

वातावरणातील बदल आणि कोरोनामुळे शेती व्यवसायाला फटका बसला आहे. त्यात रोगराईचा सामनाही शेतकऱ्यांना करावा लागतो. विविध अडचणींवर मात करून भाजीपाला उत्पादित केला तर त्याला अपेक्षित दर मिळत नाही. - शेतकरी

ग्राहकांना परवडेना

कोरोनामुळे आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. त्यात खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, किराणाच्या दरात वाढ झाली आहे. त्यात आता दैनंदिन गरजेचा असलेला भाजीपालाही दैनंदिन महागत असल्याचे दिसत आहे. - सूरज सातपुते

शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी केलेला भाजीपाला व्यापारी अधिक दराने विक्री करतात. त्यात दरामध्ये भाजीपाला विक्री करण्यासाठी येणाऱ्यांचे दर बाजारपेठेपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. - कृष्णा फुटाणे

भावात एवढा फरक का?

व्यापाऱ्यांना शेतातील कोथिंबिरीसह भाजीपाला काढण्यासाठी मजुरावर खर्च करावा लागतो. त्याची वाहतूक विविध ठिकाणी करावी लागते. या सर्व बाबींवर खर्च वाढतो. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या दरामध्ये मोठा फरक दिसून येत आहे.