शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खते, बियाणे खरेदीची शेतकऱ्यांना चिंता...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:44 IST

जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.गतवर्षी २०१७-१८ मध्ये भरलेला रबीचा व चालु वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामाचा पिकविमा शेतक-यांना अद्यापही मिळाला नाही. परिणामी, शेतक-यांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच खरीप २०१८ साठी शासनाने जाहीर केलेली अर्थिक मदत एकाच टप्प्यात देण्याऐवजी ती दोन टप्प्यात विभागून देण्यात येत आहे. बहुतांश गावातील शेतक-यांना अर्धा मे महिना उलटला, तरीही अर्थिक मदत मिळाली नाही. पहिलाच टप्पा न मिळाल्याने दुसरा टप्पा कधी मिळणार ? अशा सवालही शेतकरी करत आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सततची दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र कमी असल्याने बहुतांश वर्ग कोरडवाहु शेतीवरच अवलंबून आहे. परिणामी, तालुक्यातील फळबाग क्षेत्र कमालीचे घटले आहे. यावर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. अशातच शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही शेतक-यांना मिळाली नाही.खरीप व रब्बीची पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पिकांचे झालेले नुकसान विम्या पोटी भरुन मिळेल या आशेने शेतक-यांनी पिक विमा भरला. पिक विमा दुष्काळात शेतक-यांना सावरेल अशी अपेक्षा शेतक-यांना होती. परंतु, ही अपेक्षाही भंग झाली आहे. अशा परिस्थितीत येणा-या हंगामात खते व बियाणांची खरेदी कशी करायची ? असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे.शेतक-यांना शंका : बोगस बियाणांचे काय ?बोगस बियाणे आणि खतांचा उलगडा महसूल तसेच कृषी विभागाने केला. याचा मनस्वी आनंद शेतक-यांना झाला. असे असले तरी पुढच्या हंगामास सामोरे जातांना बियाणे आणि खते ही चांगली मिळतील का ? अशी शंका त्यांच्या मनात घर करुन आहेत. यासाठी बियाणे व खतांबद्दल कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीdroughtदुष्काळCrop Loanपीक कर्ज