शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

खते, बियाणे खरेदीची शेतकऱ्यांना चिंता...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:44 IST

जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.गतवर्षी २०१७-१८ मध्ये भरलेला रबीचा व चालु वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामाचा पिकविमा शेतक-यांना अद्यापही मिळाला नाही. परिणामी, शेतक-यांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच खरीप २०१८ साठी शासनाने जाहीर केलेली अर्थिक मदत एकाच टप्प्यात देण्याऐवजी ती दोन टप्प्यात विभागून देण्यात येत आहे. बहुतांश गावातील शेतक-यांना अर्धा मे महिना उलटला, तरीही अर्थिक मदत मिळाली नाही. पहिलाच टप्पा न मिळाल्याने दुसरा टप्पा कधी मिळणार ? अशा सवालही शेतकरी करत आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सततची दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र कमी असल्याने बहुतांश वर्ग कोरडवाहु शेतीवरच अवलंबून आहे. परिणामी, तालुक्यातील फळबाग क्षेत्र कमालीचे घटले आहे. यावर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. अशातच शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही शेतक-यांना मिळाली नाही.खरीप व रब्बीची पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पिकांचे झालेले नुकसान विम्या पोटी भरुन मिळेल या आशेने शेतक-यांनी पिक विमा भरला. पिक विमा दुष्काळात शेतक-यांना सावरेल अशी अपेक्षा शेतक-यांना होती. परंतु, ही अपेक्षाही भंग झाली आहे. अशा परिस्थितीत येणा-या हंगामात खते व बियाणांची खरेदी कशी करायची ? असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे.शेतक-यांना शंका : बोगस बियाणांचे काय ?बोगस बियाणे आणि खतांचा उलगडा महसूल तसेच कृषी विभागाने केला. याचा मनस्वी आनंद शेतक-यांना झाला. असे असले तरी पुढच्या हंगामास सामोरे जातांना बियाणे आणि खते ही चांगली मिळतील का ? अशी शंका त्यांच्या मनात घर करुन आहेत. यासाठी बियाणे व खतांबद्दल कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीdroughtदुष्काळCrop Loanपीक कर्ज