शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

खते, बियाणे खरेदीची शेतकऱ्यांना चिंता...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:44 IST

जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना भयावह दुष्काळात शासनाकडून आर्थिक अद्यापही मदत मिळाली नाही. शिवाय पीकविमाही न मिळाल्याने खते, बियाणांची खरेदी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.गतवर्षी २०१७-१८ मध्ये भरलेला रबीचा व चालु वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामाचा पिकविमा शेतक-यांना अद्यापही मिळाला नाही. परिणामी, शेतक-यांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच खरीप २०१८ साठी शासनाने जाहीर केलेली अर्थिक मदत एकाच टप्प्यात देण्याऐवजी ती दोन टप्प्यात विभागून देण्यात येत आहे. बहुतांश गावातील शेतक-यांना अर्धा मे महिना उलटला, तरीही अर्थिक मदत मिळाली नाही. पहिलाच टप्पा न मिळाल्याने दुसरा टप्पा कधी मिळणार ? अशा सवालही शेतकरी करत आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सततची दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र कमी असल्याने बहुतांश वर्ग कोरडवाहु शेतीवरच अवलंबून आहे. परिणामी, तालुक्यातील फळबाग क्षेत्र कमालीचे घटले आहे. यावर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. अशातच शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही शेतक-यांना मिळाली नाही.खरीप व रब्बीची पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पिकांचे झालेले नुकसान विम्या पोटी भरुन मिळेल या आशेने शेतक-यांनी पिक विमा भरला. पिक विमा दुष्काळात शेतक-यांना सावरेल अशी अपेक्षा शेतक-यांना होती. परंतु, ही अपेक्षाही भंग झाली आहे. अशा परिस्थितीत येणा-या हंगामात खते व बियाणांची खरेदी कशी करायची ? असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे.शेतक-यांना शंका : बोगस बियाणांचे काय ?बोगस बियाणे आणि खतांचा उलगडा महसूल तसेच कृषी विभागाने केला. याचा मनस्वी आनंद शेतक-यांना झाला. असे असले तरी पुढच्या हंगामास सामोरे जातांना बियाणे आणि खते ही चांगली मिळतील का ? अशी शंका त्यांच्या मनात घर करुन आहेत. यासाठी बियाणे व खतांबद्दल कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीdroughtदुष्काळCrop Loanपीक कर्ज